म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्म गावी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारत बांधकामाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले.या वेळी राजकिय विरोधक अंतुले साहेबांचा विसर पडला आहे अशी जनभावना भडकावत राजकारण करत असल्याने त्याला सडेतोड उत्तर देताना खासदार सुनिल तटकरे यांनी ज्या नेतृत्वाने या भागाचा विकासात्मक कायापालट केला त्या नेतृत्वाचा आम्ही नेहमीच आदर करतो.त्यांच्या आशीर्वादाची किमया आमच्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या कार्याचा विसर पडणे शक्य नसल्याचे मत आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारत लोकार्पण सोहळयाचे स्वागत कार्यक्रमात व्यक्त केले.ना.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत मौजे आंबेत येथील १६०० स्केअर मीटर प्रशस्त जागेत ५ कोटी ६० लक्ष रुपये खर्च करून सर्व त्या सोयी सुविधा निर्माण करून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.यावेळी कार्यक्रमाला खासदार तटकरे यांच्या समावेत पक्ष नेते भास्कर दाजी विचारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,अंकुश खडस,जीप माजी सभापती बबन मनवे,नगराध्यक्ष संजय कर्णिक,उपनगरध्यक्ष संजय दिवेकर,नाविदभाई अंतुले,माजी सभापती छाया म्हात्रे,गट विकास अधिकारी बाळासाहेब भोगे,जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा विखे पाटील,शाखा अभियंता रुपाली पाटिल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ.श्री व सौ.काळे, पाणी पुरवठा अभियंता फुलपगारे,मतदार संघाच्या अध्यक्षा सोनल घोले,तालुका अध्यक्षा मिना टिंगरे,सरपंच अफरोजा डावरे,उप सरपंच ऋतुजा सावंत,सरपंच प्रियंका निंबरे,सरपंच सावंत,नाना सावंत,किरण पालांडे,शेखर खोत,नवाब कौचाली आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार सुनिल तटकरे आधीकपणे बोलताना बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्म भुमितील आंबेत गावी मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील कष्टकरी नागरिकांना चांगली आरोग्य सेवा सुविधा मिळावी यासाठी सेवा करता आली याचे मनस्वी समाधान व्यक्त केले.एकीकडे दुर्गम भाग असतानाच वाहतूक आणि विकासाच्या माध्यमातुन अंतुले साहेबांसारखे नेतृत्व जन्माला आले. ज्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यात आणि देशाचे नेतृत्व केले त्यांचे माध्यमातुन येथे सर्व सुविधा निर्माण करण्यावर आमचे यशस्वी प्रयत्न आहेत.अशा मागणीचा पाठपुरावा आमचे सहकारी दिवंगत अलीशेट कौचाली हे सातत्याने करीत असत त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सन २००९ साली मी आमदार म्हणुन निर्वाचीत झालो तेव्हा येथील विकास खुंटला होता.येथे फक्त भावनीक राजकरण होत होता तेव्हा मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली.येथील जनतेचा आशीर्वाद रुपी ताकद मिळाली.मी अर्थ मंत्री झालो आणि विकासाला गती आली याची आठवण करून देताना भौतिक विकासाचा बॅकलॉग भरून काढताना मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरून काढतानाच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी निधीची तरतूद केली.कोरोना काळात जगातील विकसीत देशात मृत्युचे तांडव असताना आपण विकासाची कामे थांबवुन फक्त आरोग्य सेवेला प्राधान्य दिले.आदिती तटकरे पालकमंत्री असताना अनेक गावांतील आरोग्य केंद्र उभरण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता.नव्याने म्हसळा तालुक्यातील पांगलोली,पाभरे आणि संदेरी या तीन ठिकाणी उपकेंद्र इमारत बांधकामाला परवानगी देण्यात आली असल्याचेही जाहिर केले.आंबेत येथील पुलाचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाले असून येथे नवीन पुल उभारणी करण्यात येईल असे आवाहन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नव्याने अर्थसंकल्प मांडतील तेव्हा आंबेत पुलाला आवश्यक आर्थिक तरतुद करतील असा विश्वास व्यक्त केला.श्रीवर्धन म्हसळा मतदार संघात पर्यटन विकासाला चालना मिळाली असल्याचे निदर्शनास आणून देताना गेल्या तीन ते चार महिन्यांत पर्यटन स्थळी पर्यटकांची चार पटीने वाढ झाली आहे.आंबेत आरोग्य केंद्रात सर्व सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर असतानाच येथे गोर गरीब कष्टकरी नागरिकांनी जास्तीत जास्त आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना गरोदर मातांना चांगली आरोग्य सेवा सुविधा मिळावी.नवीन जन्माला येणारी पिढी सशक्त जन्माला यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आगरदांडा ते दिघी तुरूबाडी पुल उभारणी करिता १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याची निविदा प्रक्रिया पार पडल्याची माहिती देताना खासदार सुनिल तटकरे यांनी मतदार संघातील श्रीवर्धन हरिहरेश्वर,दिवेआगर,म्हसळा,बागमांडला येथील रस्ते,पुल उभारणीसाठी ह्याम अंतर्गत ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने मंजुर करण्यात आला असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात ज्या ग्रामस्थानी छोट्या मोठ्या विकास कामांसाठी निवेदन दिले आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन देत आंबेत आरोग्य केंद्रात गेल्या तीन ते चार महिन्यांत डॉ.श्री व सौ.काळे दामप्त्यानी सात हजार रूग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली त्यांचे कार्याचे कौतुक करून त्यांचा शाळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर बनकर यांनी,तर सूत्रसंचालन गणेश म्हाप्रलकर यांनी केले.