दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
क्रांतीसूर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मः-
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म बागेवाडी जिल्हा विजापूर (कर्नाटक) येथे इस 1131 मध्ये वैशाख शुध्द तृतीया(अक्षय तृतीया) दिवशी मादिराज व मादलांबिका या वीरशैव दांपत्याचे पोटी जन्म झाला.
त्यांचे वडील मादिराज व माता मादलांबिका दोघे ही सद्वर्तनी होते.. त्या काळच्या विषमतावादी सामाजिक परिस्थिती मुळे त्यांचे मन अस्वस्थ व्हायचे , म्हणूनच केवळ सामाजिक सुधारणा नव्हे तर समग्र बहुजन समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी संकल्प केला.
समता, बंधुता,एकता, संस्कार,सदाचार आणि समृद्धी या मार्गाने दंभाचार,अनाचार, अविचार,अविवेक,याचा संपूर्ण बिमोड करण्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केले.
“सत्य बोलणे हाच देव लोक आहे असत्य हाच मृत्युलोक ”
शुध्द आचरण हेच स्वर्ग व अनाचण हेच नरक हे विवेकनिष्ठ तत्वज्ञान प्रबळ इच्छाशक्ती बुध्दी च्या व तत्वज्ञानाच्या बळावर बाराव्या शतकात जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले.
वीरशैव लिंगायत समाजातील ३५० च्या वर जाती उपजातीच्या लोकांना एका छताखाली आणुन त्यांना ऐकोदेऊपास्ना करण्यास सांगितले
त्यांनी आपल्या कृतिशील उपदेशाने समाज जिवनाच्या उक्ती, कृती, आणि मती यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला व समाजाला आत्मभान व आत्मशोध याची जाणीव करून दिली म्हणून च महात्मा बसवेश्वर हे आधुनिक व मध्ययुगीन भारताचे जनक ठरतात, एवढेच नव्हे तर विश्वातील एक लोकोत्तर युगपुरुष ,
“युगप्रवर्तक “बहुजन नायक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते.
महात्मा बसवेश्वर हे आठ वर्षांचे असतांनाच त्यांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करणार्या उपनयन संस्काराला विरोध केला होता ,व या अनिष्ट प्रथेचा त्यांनी विरोध केला एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पुढिल काळात तात्कालिक स्थितीचा डोळसपणे अभ्यास करून समाजाला समर्थ विचार देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले वडिलांचे बालपणी अकस्मात निधन झाल्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराष्ट्रात मंगळवेढा राज्याचे तात्कालीन मंत्री बलदेव हे त्यांचे मामा असल्यामुळे ते मामा कडे राहायला आले.पुढे याच मामाची कन्या गंगाबिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला.आणि मंगळवेढ्याचे कोषागार मंत्री म्हणून महात्मा बसवेश्वरांची निवड करण्यात आली ..
त्यांनी जगातील पहिली लोकशाही सांसद ही बाराव्या शतकात शिवानुभव मंठप या नावाने स्थान केली.यात सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार होता मग त्यात कोणीही असो यात ७७० शरण-शरणी(स्त्री-पुरूष) होते…
या लोकसभेत अनेक विषयांवर चर्चा होत असे आणि न्याय देखील होत असे…
काही काळानंतर मंगळवेढ्याचे दुसरे मंत्री सिध्दरस यांची कन्या “निलांबिका” हिच्यासोबत महात्मा बसवेश्वरांचा दुसरा विवाह झाला.हा विवाह “आंतरजातीय विवाह होता”
ज्या मंगळवेढा यांची राजवट कल्याण येथे गेली आणि राजा बिज्जल याचा सार्वभौम राजा झाला व महात्मा बसवेश्वरांंना त्यांनी या राज्याचा महामंत्री (पंतप्रधान )म्हणून नियुक्त करण्यात आले. महात्मा बसवेश्वरांनी पुरोगामी आणि आधुनिकतेचा इतिहास घडविला आणि लोकशाहीचा पहिला सिध्दांत या विश्वाला दिला.
अशा महान वीरशैव धर्म उध्दारक महात्मा बसवेश्वरांना शतशः नमन.
साईनाथ बावनपल्ले
अध्यक्ष:-शिवा संघटना विद्यार्थी आघाडी लोहा शहर