दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे अखेर पिडीतांनी शासनाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या कडे न्यायासाठी धाव घेऊन तक्रार केली आहे.
पुढे तक्रारीत तक्रारदार हनमंत रामकिशन शेटे रा. लोहा यांनी असे नमूद केले की,लोहा येथील जगदंब माऊली हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चुकीमुळे दि. २४-११-२०२१ रोजी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वांरवार अर्ज करून ही प्रशासनाने कारवाई केली नाही.
लोहा येथील जगदंब माऊली हॉस्पिटल येथे तक्रारदार यांची पत्नी सुमन हनमंत शेटे हिला प्रसुतीसाठी दाखल केले होते तेथील डॉक्टर गणेश चव्हाण व डॉ.संजय जवळगेकर यांच्या चुकीच्या उपचारांमुळे दि.२४-११-२०२१ रोजी त्यांच्या दवाखान्यात मयत झाली.
तक्रारदार यांच्या पत्नीच्या मृत्यूस वरील दोन्ही डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांची पत्नी मयत झाली आहे त्यामुळे तक्रारदार यांनी लोहा पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, पोलीस महानिरीक्षक नांदेड, जिल्ह्यधिकारी नांदेड, तसेच डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आदीकडे तक्रारी अर्ज वांरवार केले परंतु प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. तक्रारदार यांच्या पत्नीस मयत होऊन सहा महिन्याचा कालावधी झाला आहे.
” सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे तक्रारदार वांरवार प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी अर्ज करीत आहे पण त्यांची दखल कुणी ही घेत नाही दोषींवर कारवाई होत नाही .
पाणी कुठे मुरतंय हे कळत नाही त्यामुळे त्यांचा आता प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी आता त्यांना न्याय मिळण्यासाठी थेट त्यांच्या भावाच्या हस्ते निळा येथे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन न्याय मागणीसाठी निवेदन दिले असल्याची माहिती तक्रारदार हनमंत रामकिशन शेटे रा लोहा यांनी दिले असल्याची माहिती दिली.