दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्याच्या राजकारणातला मागचा महिना हा प्रचंड वादळी राहिलेला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजप युतीचं नवं सरकार तयार झालं.
त्यानंतर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फार काही हालचाली दिसत नव्हत्या. राष्ट्रवादीचे बरेच नेते हे संजय राऊतांच्या अटकेवरही मौनात दिसून आले. मात्र आता सत्तांतर त्यानंतर झालेला मंत्रिमंडळ विस्तार आणि गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली संजय राऊत यांची अटक अशा अनेक मोठ्या घडामोडी घडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे मातोश्री निवास्थानच्या बैठकतीत नेमकी खलबलं काय? असा सवाल राज्याच्या राजकारणात उपस्थित होणं सहाजिकच आहे.