दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी(बु.):- कंधार तालुक्यातील सिरसी (बु.)नवीन वसाहत येथे मागील दोन दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असून ऐन गणेश उत्सवात महावितरणचा विज पुरवठा बंद आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही. दळण बंद, चार्जिंग नसल्यामुळे मोबाईल फोन सुविधा बंद, त्यामुळे लोकांना एकमेकांशी संवाद साधता येत नाही.
रात्रीच्या अंधारात उजेड नाही. गणपती बाप्पाचा उत्सव अंधारात साजरा करावा लागला, पंखे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंधार तालुका महावितरण कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते श्री. व्यंकटी जाधव यांनी संपर्क साधला असता ते स्थानिक कर्मचारी यांच्याशी बोलून चालू करतो असे फक्त म्हणत आहेत. विद्युत पुरवठा चालू करीत नाहीत. तेव्हा महावितरणच्या प्रशासनाने सिरसी (बु.) नवीन वसाहत येथील विद्युत पुरवठा चालू करण्यात
यावा अशी मागणी सिरसी (बु.) नवीन वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.