दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मलकापूर (प्रतिनिधी):- वडोदा व शिरसोळी शिवारातील सिंगल फेज व शेतातील तुटलेल्या तारा तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडोडा शिवारातील नागरिकांना व शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काहि दिवसांपासून सिंगल फेजचा प्रश्न व शेतातील तारा तुटलेल्या आहेत. याबाबत अनेकवेळा तोंडी व लेखी स्वरूपात कळूनही कुठलीही कारवाई वीज वितरणच्या वतीने करण्यात आली नाही. तेव्हा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच येत्या दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी न लावल्यास स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी स्वभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंगोटे, शिरसोळीचे उपसरपंच अरविंद भोलवनकर, विष्णु भोलवनकर, योगेश सुरलकर, मोहन भोलवनकर, नीना नाफड़े, शिवाजी हिवाळे, विशाल भगत, यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.