दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेनेतील बंडखोरी नंतर प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने एकाच मंचावरती उपस्थित असायचे. सध्या दोघांमध्ये बिनसल्याने दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर बसवलेली देवी सुप्रसिद्ध आहे. या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला होता. शिवसेना आणि शिंदे गटाचे संबंध ताणले गेले असताना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र, बंडखोरीनंतर एकत्र दिसणारे प्रताप सरनाईक आणि शिंदे कुठेही सोबत दिसले नाहीत. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यापासून फारकत घेऊन चार हात लांब राहत असल्याचे बोलले जात आहे.