दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
=================== =जालना विधानसभा मतदारसंघातील परतीच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकिंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाया गेला असुन जालना तालुक्यातील नुकसान झालेल्या भागात आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी धारकल्याण, कडवंची, नंदापूर ,पिरकल्याण आदी भागातील प्रत्यक्ष शेतावर जाऊन *शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर* यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकाची पाहणी केली, यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी ,तूर, मोसंबी ,द्राक्ष बागा ,आदींचा समावेश आहे .यावेळी नुकसानका झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली . या संदर्भात त्वरित जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या असून मदतीसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी करणार आहोत असे खोतकर यांनी सांगितले .यावेळी शिवसेना संपर्क पंडितराव भुतेकर ,,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख संतोषराव मोहिते ,उप तालुका बंडू राजे ,उपविभाग प्रमुख आप्पा उगले,प्रगतसिल शेतकरी, सदानंद उगले, आप्पासाहेब घोडके,माजी सरपंच रावसाहेब इंगोले ,सर्जेराव वाघ, संजय वाघ विष्णु वाघ ,बळीराम वाघ यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.