दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी परतुर –
मा.एकनाथ संभाजीराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या कार्यालया मार्फत जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात आज सुद्धा अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, यापूर्वीच्या कमी अधिक पावसामुळे खरीप पीकांचे खूप मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे,करण हंगामी पाऊस व परतीचा पाऊस सतत पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे ज्या ठिकाणी एकरी १२ क्विंटल सोयाबीन व्हायला पाहिजे होते त्यात ३/४ क्विंटल घट झाली आहे एकरी सोयाबीन पिकाचे ८ ते ९ हजार रुपये नुकसान झालेले आहे, तसेच आदिकच्या पावसामुळे कापसाचे उत्पादन ४० टक्के घटल्यामुळे नुकसान झाले आणि कापूस एकरी ९ ते १० क्विंटल व्हायला हवा होता पण कधी कमी तर कधी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठे नुकसान होऊन ३ ते २ क्विंटलच्या उत्पादनात घट होऊन जवळपास एकरी किमान १८ हजार रुपये नुकसान झालेले आहे, यावर्षीच्या २०२२ या वर्षामध्ये लहरी पाऊस पडल्यामुळे सगळ्याच खरी पिकांच्या उत्पादनात २५ ते ३५ घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहज करावा लागत आहे, पारंपारिक पद्धतीने अनेक वर्षापासून उघड्या डोळ्यांनी घाट्याचा धंदा करणारी देश सेवा म्हणून काम करीत असलेला शेतकरी याला राज्य आणि केंद्र सरकारने अडचणीच्या वेळी मदत करायला हवी मदत केली तरच शेतकऱ्यांना सहकार्य होईल अन्यथा हळूहळू एक एक दिवस शेतकरी शेती पासून बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही हे सत्य टाळून चालणार नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा दिवाळीपूर्वी जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने अनुदान देऊन मदत केलीच पाहिजे. जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील खरीप पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून राज्य व केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान स्वरूपात आर्थिक सहकार्य मिळावे शेवटी आसी हि मागणी मागणी करून पुढे इशारा ही देण्यात आला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मदत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खरीप उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी सोबत कृष्णा गोवर्धन सोळंके (तालुकाध्यक्ष परतुर) ज्ञानेश्वर केवारे (मनविसे जिल्हाध्यक्ष जालना) सोपान गोरे मनसे (शहराध्यक्ष परतूर) अर्जुन मोहिते (शाखाध्यक्ष आनंदवाडी) तुकाराम कदम (उप तालुकाध्यक्ष परतुर) विश्वंभर कुलकर्णी महेश पाष्टे, हनुमान केवारे, आत्माराम जगताप, लक्ष्मण चव्हाण…