दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
राज्यातील 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा कारण भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार बालकांच्या प्राथमिक मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. वाडी, तांडा,पाडे व वस्ती वरील शाळा टिकल्या पाहिजेत जेणेकरून बहुजनांची, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजुरांची, ऊसतोड कामगार वीटभट्टी कामगारांची मुलं शिकली पाहिजेत. शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित राहीला पाहिजे यासाठी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या वतीने अध्यक्ष एन डी राठोड, बुद्धिस्ट सर्व्हिसमन फोरमचे राजेंद्रजी कांबळे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी तहसीलदार अहमदपूर मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले.
या निवेदनावर अविनाश मंदाडे,संजय कलमे,प्रा भगवान अमलापुरे, मधुकर जोंधळे,एल डी कांबळे, बालाजी तीगोटे, विलास पडीले सह इतर पदाधिकार्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.