दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार मा.श्री.अभिजित जगताप यांना निवेदन देण्यात आले.चांदुरबाजार तालुक्यातील श्री.प्रदीप बंड व इतर शेतकरी यांनी शेतातील संत्रा पिकावरील फळगळी साठी राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र,नागपुर यांना वारंवार निवेदन देवून अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे संशोधन केले नसल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे शेतातील बाग तोडून,NRC वर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे.त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.राष्ट्रीय फळ संशोधन केंद्र,नागपूर यांनी मागील ७ वर्षापासून संत्रा फळगळतीवर शेतकऱ्यांची मागणी असतांना कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या गेले नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना संत्रा बागा तोडाव्या लागत आहे.तरी राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र,नागपुर केंद्र यांचेकडून कोणतेही संशोधन का केले गेले नाहीत याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी.राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र,नागपूर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे संत्राबागा या तोडाव्या लागल्या आहेत.तरी अश्या शेतकऱ्यांना हेक्टरी २ ते २.५ लक्ष रुपये मदत शासनाने तातडीने जाहीर करावी.या मागणीसाठी संत्रा उत्पादक शेतकरी व प्रदिप भाऊ बंड उपोषण करत आहेत.या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करून NRC वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती शासनाकडे सर्व संत्रा उत्पादक शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली.
प्रदिपभाऊ बंड यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा निवेदनाद्वारे दिला आणि लवकरात-लवकर आंदोलनातील दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शंभू मालठाने,आकाश खारोडे जिल्हाप्रमुख,प्रहार विद्यार्थी संघटना,बाला शेरकर,बाळासाहेब रोंघे,निरंजन गावंडे,सनी शेळके,श्रीकांत नाथे,परवेज सौदागर,अमोल पोटे,निलेश चोपडे,छोटु अढाऊ,ऋत्विक काकड,एवन गायन,अमर अब्दुल्ला,शाम धुमाळे,अक्षय गायगोले,गोपाल शिंगणे,अमोल शिंगणे,निकेश उंबरकर,शकील अ.रऊफ,योगेश दोंबले,श्रीकृष्ण तायडे,कैलास गीते,सागर अधाऊ,प्रवीण खारोडे,अब्दुल मुनफ,कदर शेख,मोहोंमद अफरोज आदी कार्यकर्ते व संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.