दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजीनगर- शितल रमेश पंडोरे –—————————–
दि.11 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वर शाई फेक करण्यात आली होती . पैठण येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी जे डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल जे वादग्रस्त वक्तव्य,विधान केले होते . त्या प्रकरण मुळे सर्वत्र जे नैराश्य आणि आक्रमक वातावरण निर्माण झाले होते.
वादग्रस्त विधान आणि शाईफेक वादावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितलीय. या वादावर माझ्याकडून पडटा टाकतोय. आणि इतरांनीही हा वाद थांबवावा, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. वादग्रस्त विधान शाईफेकीच्या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी लिखीत स्वरुपात माफी मागितलीय. आणि त्याबरोबरच पोलिसांचं निलंबन आणि पत्रकारावरची कारवाई मागे घेण्याचं आवाहनही केलंय. मात्र मागच्या 3 दिवसांत या प्रकरणाला अनेक फाटेही फुटले.माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, महापुरूषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
माझी कोणाविषयीही तक्रार नाही, कोणाला अटक करण्यात आली असेल तर त्याची मुक्तता करावी. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे तेही मागे घ्यावं. पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो. माझ्यावर शाईफेक करणाऱ्यांबद्दल मला काहीही बोलायचं नसून माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असं पाटील म्हणाले.