दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील ” करियर कट्टा ” व आयसीआयसीआय बँकेकडून कँम्पस् मुलाखत घेण्यात आले . ही मुलाखत कोरोना काळानंतर पहिल्यांदाच यशस्वीपणे भव्य स्वरूपात घेण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिणे , उद्घाटक रणजित पाटील हंगरगेकर , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , आयसीआयसीआय बँकेचे सिनियर बी.डी.एम. मयुर पाटील , आयसीआयसीआय सिनियर टीम लिडर आयुष्य गाणोरकर , व्यासपीठावर करियर कट्ट्याचे समन्वयक डॉ. शिवसर्जन टाले , डॉ. संतोष शेंबाळे हे उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा.डॉ. मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन डॉ. गणंजय कहाळेकर यांनी केले . याप्रसंगी 25 विद्यार्थ्यांची निवड बँकेच्या वतीने करण्यात आली .
प्रमुख पाहुणे मयुर पाटील यांनी बँकेच्या भरतीचे उद्देश , स्वरूप आणि उत्तम कर्मचारी बनण्यासाठी आवश्यक पात्रता सांगितले . विद्यार्थी दशेपासूनच कठोर परिश्रमाने यश मिळविता येते असे विचार मांडले .प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अपयश ही यशाची पहिला पायरी असते . यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत , जिद्द आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते . या सोयी सुविधा आमच्या महाविद्यालयाकडून पुरविण्यात आम्ही सदैव तत्पर आहोत . येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण लाभ करून घ्यावा . भविष्यात देखील अनेक अशा संधीचे दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचा आपण लाभ करून घ्यावे असे विचार व्यक्त केले . यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .