दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
गावठाण क्षेत्राच्या बाहेर असलेल्या क्षेत्रातील प्लाॅटला गोकुंदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजकुमार माळवे हे सर्रास गावठाण प्रमाणपत्र देत असल्यामुळे बिनधास्त दस्त नोंदन्या बिनधास्तपणे चालु आहेत.ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तरी या काळ्या बाजाराला आळा बसेल?असा लोकांचा कयास होता.मात्र तो साफ चुकीचा निघाला आहे. शिक्षितांच्या सत्तेत भ्रष्टाचार मुक्त कारभार चालत नसेल तर लोकांची फसगत,पिळवणुकअशीच चालणार राहाणार काय?असा सर्वसामान्य नागरीकांचा सवाल आहे.मूळ गावठाण आणि सुधारीत निकषा नुसार २०० मिटर सभोवतालच्या बाहेरील क्षेत्राला दिलेल्या बोगस गावठाण प्रमाणपत्रांच्या चौकशी कामी ग्रामपंचायती समोर आंदोलन उभारण्याच्या हालचालींना वेग येऊ लागलाआहे.गोकुंदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मात्र गावठाण क्षेत्राबाहेरील नगर रचना विभागाच्यां परवानगी शिवाय ग्रामपंचायतीने ले-आऊटला मंजुरी दिलेल्या क्षेत्रातील प्लाॅटींगला ग्रामविकासअधिकारी राजकुमार माळवे बिनधास्त गावठाण प्रमाणपत्र देतआहेत.तसेच गायरान जमिनीसुद्धा सोडल्या नाहीत.त्यातील प्लाॅटींगला बोगस गावठाण प्रमाणपत्र देण्याचे धाडस केले जातआहे.त्यांच्या या धंद्याला सत्ताधारी चाप लावत नसतील तर,त्यांची मुकसहमतीअसेलअसा अणुमान लावायला वाव मिळतो.अशा बोगस गावठाण प्रमाणपत्राच्या मुळ रेकार्डवर नोंदीअसतीलचअसे नाही.याचा विपरीतआणि दुरगामी परिणाम गोकुंदा येथिल नागरिकांवर होऊ शकतो.एकाच मालमत्तेच्या प्लाॅटचे अनेक मालमत्ताधारक होऊ शकतात.यापुर्वी त्याचा प्रत्येय अनेकदा समोर आला.मागच्या सत्ताकाळात सत्तेतील कांही गेंड्याची कातडी असलेले प्लाॅटधारकांच्या परस्पर प्लाॅटची मालकी बदलणे,परस्पर विक्री करणेअसे प्रकार वाढले होते. मौजे कमठाला येथील गजानन कर्हाळेंचे परस्पर विकलेल्या दोन प्लाॅटची रक्कम भरुन देण्याची नामुष्की माजी उपसरपंचावरओढावली होती.सत्तेच्या उन्मादातुन आयटीआय लागून असलेला पाच गुंठे स्मशान भूमीचा भूखंड ही विक्री केला होता.आज तेथे दराडे काॅम्प्लेक्ससह टीनशेड थाटलेआहेत.किनवट भूमी अभिलेख कार्यालयातील थ्रष्टाचार्यांशी संगनमत करुन ही उलथापालथ केली ती अशाच बोगस गावठाण प्रमाणपत्रा वरुनच दिसून येतेआहे.त्या पाच गुंठे स्मशानभूमीचाआजच्या सत्ताधार्यांनी शोध घ्यावा.अशीही मागणी जोर धरत आहे.