दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकूर,
चाकुर तालुक्यातील महाळंग्रा येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लेकरांना उच्च प्रतीचे शिक्षण देत असलेले राधेय चारीटेबल ट्रस्ट द्वारा संचलीत डि बी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटने ग्रामीण भागात शिक्षणाचा आधारवड म्हणून एक ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी केले.
महाळंग्रा येथील डी.बी ग्रुप इन्स्टिट्युटमध्ये जल्लोष २०२३ च्या सांस्कृतिक कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर उद्घाटक उद्योजक चंद्रकांत गीत्ते तर प्रमुख पाहुणे माजी महापौर दिपक सुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पो.उप निरीक्षक राजेश घाडगे, डॉ. बालाजी वाकुरे, कवी राजेसाहेब कदम, श्रीगण रेड्डी संस्थेच्या सचिव प्रणीता बेंबडे उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना तिरुके म्हणाले की,दिनेश बेंबडे हे शेतकऱ्यांचा मुलगा असुन त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या संस्थेची उभारणी केली आहे. शेतकर्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहीजे अशी भावना व्यक्त करुन अनेक दु:ख पचवत, अर्थीक नुकसान सहन करत चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथे उजाड माळरानावर दहा एकर जमीन घेऊन इन्स्टिटट्युट उभे केले आहे. स्वतःच्या पायावर उभा राहणारे शिक्षण डी.बी ग्रुपमध्येच दिले जाते येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी नोबेल पारितोषिक घेऊन आपल्या संस्थेचे नाव मोठे करणार असल्याचे ते बोलत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीकांत ढगे, डॉ. जयदीप यादव, प्रा. विशाल जाधव, विद्यार्थी ,विद्यार्थींनी,पालक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संस्थेच्या माध्यमातून केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण देण्याचे आमचे ध्येय असून शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना डी बी ग्रुपच्या माध्यमातून उच्च शिक्षण दिले जावे या भावनेतूनच ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे पसरविण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे.
दिनेश बेंबडे,
अध्यक्ष, राधेय चरिट्रबल ट्रस्ट