दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा ६ ते ११ एप्रिल दरम्यान होत असुन मुख्य चुना वेचण्याचा व पालखी आगमन शुक्रवारी (ता.७) रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी दर वर्षी दहा लाखाच्या वर भाविक दाखल होतात.त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये.कायदा सुवस्था,व भाविकांच्या सूरर्क्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून स्थानिक प्रशासन ग्राम पंचायत,देवस्थान ट्रस्टने तयारी केली आहे.
श्री येडेश्र्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला व देवीच्या पालखी सोहळ्यात देवीच्या पालखी वर येथील देवीच्या चुन्याच्या रानात चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्याची प्रथा जुनीच असल्याने या कार्यक्रमासाठी राज्यभरासह बाहेर राज्यातून लाखोंच्या वर येतात.यामुळे या यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागावर ताण पडतो.
याची पूर्ण तयारी केली असून
यात्रा काळात भाविकांच्या आरोग्यसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक आरोग्यबूथ तर वैद्यकीय अधिकारी१९,पर्यवेक्षक १०,आरोग्य सेवक २०,सेविका १०,परिचर १० अतिरिक्त कर्मचारी रुजू झाल्याचे डॉ.सचिन तेलप यांनी सांगितले.
महावितरण कडून यात्रेसाठी परिसरातील रोहित्र,विद्युत वाहिन्या,दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पर्यायी व्यवस्था येडशी येथुन उपलब्ध आहे शिवाय ग्राम पंचायत मागणी नुसार यात्रेतील व्यावसायिकांना वीज पुरवठा आदी कामे करणार आहे असे शाखा अभियंता स्नेहा कोंगलावर यांनी सांगितले.
येडेश्र्वरी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या २००,तर लातूर,बीडच्या १५० बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे.बीड विभागाचे यात्रा शेड बिजगुनन केद्राच्या बाजूला बीड रोडवर,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद विभागचे बीएसएनएल उपकेंद्रा जवळ तर बार्शी,करमाळा,परंडा आगाराच्या बसेससाठी मुंबई,पुणे,कोल्हापूर,पंढरपूर,कडे जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी रोडवरील महावितरण उपकेंद्राच्या शेजारी करण्यात आली आहे.वाहतूक नियंत्रक महादेव थोरबोले यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाचे सापोनि अतुल पाटील यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी १,सापोनी,पोनि ४५,पुरुष पोलिस ३५०,महिला १५०,होमगार्ड ३००,महिला होमगार्ड १५० असा पोलिस बंदोबस्त दोन अग्निशामक बंबाची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.
मंदिर ट्रस्टने शुद्ध (आर. ओ.)पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून दर्शन रांगेत पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.मंदिर परिसर,सभामंडप,या ठिकाणी ६५ तर आमराई परिसरात २० सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय तसेच मंदिर परिसरात पोलिसांच्या जोडीला खाजगी ६० सुरक्षा रक्षक तुकडी नेमल्याचे देवस्थान ट्रस्टचे संतोष आगलावे यांनी सांगितले.
तर ग्रामपंचायतने ३० टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी तर लातूर येथील भाविक खैरमोडे यांचे १०
तर बार्शी येथील माजी आमदार यांच्या वतीने २० अशा ६० टँकर ची सोय तर एक अग्निशामक बंबाची व्यवस्था केल्याचे सरपंच सुजाता देशमुख यांनी सांगितले.
पालखीवर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी.
पालखी चुन्याचा रानात दाखल होताच ५ ते १० मी.पालखीवर हेलीकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी तुळजापूर चे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे माजी सरपंच विकास बारकुल यांनी सांगितले.