दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
आगामी भविष्य हे इलेक्ट्रीकल वाहनांचे असून व त्यांची मागणी सातत्याने वाढत असल्याने औरंगाबाद येथे इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये केले आहे
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, उद्योग वाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. ऑरिक सिटीमध्ये जगातील अनेक देशांनी गुंतवणूक करुन औरंगाबादला पसंती दिली आहे. तैवान मधील कमर्शियल इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या ‘फॉरमोसो’ आणि दुचाकी निर्मिती करणा-या ‘अहमनी’ या उद्योगांनी औरंगाबादेतील ऑरिक सिटीत गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा.
तसेच औरंगाबाद शहर हवाई, रेल्वे तसेच रस्ते मार्गानी देखील प्रमुख शहरांशी जोडलेले असल्याने उद्योगांना चांगल्या दर्जाची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यात ऑटोमोबाईल उद्योगांला मोठी मागणी असल्याने तैवानमधील फॉरमोसो आणि अहमनी या उद्योगांना औरंगाबादेत गुंतवणुकीसाठी मोठी संधी आसून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे चव्हाण यावेळी म्हणाल