दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
आज घडीला सर्वा समोर उभा राहिलेला एक महाभयंकर प्रश्न म्हणजे आज रोजी आपल्या देशात ज्याला आपण सुजलाम सुफलाम असे संबोधतो परंतु अशा या सोन्याची लंका गणलेल्या देशात मुलींची संख्या कमी होणं हा समाजासमोर फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आई मला जगायचंय,फार मोठं व्हायचंय, या देशाच्या मोठ्या पदावर मला काम करायचंय,या समाजाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचय, फक्त मला जगायचंय.
या वरील ओळी समाजामध्ये काहीतरी मागण्याचा प्रयत्न करत आहे या मागणीला आपण समाज म्हणून आई-वडील भाऊ कशा पद्धतीने पहायचंय हे आपण ठरवायचंय. हे सर्व गर्भातल्या एका लेकीची आर्थ यातना काहीतरी सांगत आहे ज्या लेकीला या लक्ष्मीला स्वतःच्या बहिणीला आणि मोठे झाल्यावर कुणाच्यातरी सोबतीला जन्माला यायच्या अगोदरच मारून टाकलं जात आहे हे सर्व पाप फेडण्यासाठी या समाजाला नर्क ही कमी पडणार आहे .तुमची भावना का बदलली या पाठीमागे काहीतरी अभ्यास व्हायला हवंय.
आई पाहिजे, ताई पाहिजे ,मैत्रीण पाहिजे ,पत्नी पाहिजे मग या स्वार्थी समाजाला लेक का नको असा गंभीर प्रश्न पडतो. मातृत्वाचं हे ऋण फेडण्याची शिक्षा या लहान जीवालाच का ज्याने मदर तेरेसा, मादाम कामा, पी टी उषा, प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी व किरण बेदी अशा जाज्वल्य संपन्न महिला ज्यांच्याकडे पाहून अभिमानच काय फार मोठा गर्व वाटावा अशा महिला आपल्या जगामध्ये कीर्ती ठेवून गेल्या त्यांचे कार्य त्यांची भावना निस्वार्थीपणा कधी कामाला येईल हा फार मोठा प्रश्न सतावतो.
आज रोजी प्रत्येकाला दादा पाहिजे बाबा पाहिजे घराणे शाही चालवण्यासाठी वंशज पाहिजे मग तो वंशज मुलगाच का मुलगी का नको असा प्रश्न जेव्हा परत परत डोळ्यासमोर येतो तेव्हा या सुंदर नाजूक कळ्या फुलण्याआधीच का मिटवल्या जातात स्त्रीच करते स्त्री जन्माचा धिक्कार अशा नवनवीन बातम्या आपण दररोज पेपर मध्ये वाचतो, टीव्हीवर पाहतो, टीव्ही मध्येही समाज महिलेलाच का हिनवतो तिच्यावर अमानुष अत्याचार का करतो तिला ही मानहानी करण्याची वागणूक का देतो अशा या रूढी परंपरा चालू असल्याकारणाने आज भारतामध्ये मुलींचे प्रमाण अल्प झाले असून भारताचा भावी काळ फार कठीण जाणार आहे प्रत्येकाने यावर गांभीर्याने विचार करायला हवा आपण आज घडीला आपल्या मातेला आई म्हणतो पत्नीला बायको म्हणतो प्रेमिकेला प्रियसी म्हणतो मग या जन्माला येणाऱ्या मुलीला लेक म्हटल्यास किंवा घराण्याचा वंशज म्हटल्यास काय चुकीचे होणार आहे यावर विचार व्हायला हवा कारण थोर महिलांची ख्याती पाहता आपणही आपली मानसिकता बदलायला हवी आपल्या घरचा वंशज म्हणून मुलींना पहावे तिला मुक्तपणे संचार करण्यासाठी तिच्या सर्व गरजा आपण आई-वडील न म्हणता तिचे जोडीदार मित्र म्हणून पहावे निश्चितच या भावनेने जगल्यास समाजामध्ये मुली विषयी जागृती निर्माण होईल आवड निर्माण होईल तिला जगण्याचा अधिकार मिळेल .ती आणखी जिजामाता ,सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई बनू शकेल हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही आम्ही या समाजातल्या प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन स्त्री जन्माचा सत्कार करायला तसेच तिच्याकडे वंशाचा दिवा म्हणून पहायला कसलीच अडचण नाही त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव ,मुलगी हाच खरा वंशाचा दिवा समजून तिला जगण्याचा अधिकार देण्यात यावा तिला मुक्तपणे संचार करण्यासाठी तिच्या पाठीशी मित्रत्वाच्या नात्याने सर्व कुटुंबाने राहिल्यास निश्चितच मोठमोठ्या पदावर कार्य करण्यासाठी ती सक्षम बनेल आणि नकुशी वाटणारी आपली मुलगी सर्वांनाच हवीहवीशी वाटेल असा दृष्टिकोन प्रत्येकाने मनामध्ये बिंबवल्यास त्या मुलीकडे कसल्याही नराधमाचा डोळा तिरक्या नजरेने पाहणार नाही हे मात्र सत्य आहे.त्यामुळे स्त्री जन्माचा प्रत्येकाने स्वीकार करावा व तिला मुक्तपणे जगण्याचा अधिकार द्यावा.
लेखक
श्री विक्रम बलभीमराव पाचंगे प्राथमिक पदवीधर मानमोडी
जिल्हा उस्मानाबाद.