दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
येथील नवतरूण युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांचा सामाजिक आपतीत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी धावून जात असलेल्या साई ग्रुपच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप करण्यात आले. अतनूर येथील परवाला दुपारी शॉर्टसर्किटमुळे ज्ञानोबा पांडुरंग मंगले व दत्ता पांडुरंग मंगले यांचे घर जळून खाक झाले.यामध्ये जीवनआवश्यक वस्तूही जळून गेलेल्या होत्या. यांना आर्थिक मदत म्हणून साई ग्रुपच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी साई ग्रुप चे अध्यक्ष विजय पाटील-गव्हाणे, साहेबराव पाटील-गव्हाणे, माजी सरपंच रमेश बोडेवार, ग्राम विकास अधिकारी मैफुज मनियार, अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, राहुल गायकवाड, सोसायटीचे संचालक मारुती गुंडीले, रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया आठवले गटाचे जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, फय्याज मुंजेवार, जलील आतार, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नितीन सोमुसे, चिंचोलीचे उपसरपंच राजेंद्र बडरे, अल्लाबक्श शेख, भास्कर पाटील, संजय कुलकर्णी, परमेश्वर बालाजी, कोंडामंगले नागनाथ, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कापडे, पप्पू सोमुसे, विश्वनाथ कोकणे, संजय येवरे, गोविंद कोकणे,राजेसाहेब मुंजेवार, प्रदीप कोकणे, मुकेश बोडेवार, राजू बिचकुंदे, मनोहर मुगदळे, शिराज खंडगावे, पमा वर्ताळे, नरेश कदम, तानाजी सोमुसे, गुंडू बोडेवार, पप्पू सासट्टे, रवी कल्पे, गोविंद बारसुळे, ईस्माईल मुंजेवार, बाजीराव कापडे, गंगाराम गायकवाड उपस्थित होते.