दैनिक चालू वार्ता मुंबई प्रतिनिधि-संभाजी गोसावी
उद्योगपती सायरस मिंस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्या तीन दिवसांत यासंदर्भात आदेश काढला जाणार आहे. सायरस मिंस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर येत असून सीट बेल्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते अशी सध्या चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. काल याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत याबाबत महत्त्वांची मोठी घोषणा केली आहे. यावेळी नितीन गडकरी पुढे म्हणाले… कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले असून यामध्ये सीट बेल्ट न लावता पकडल्यांस एक हजार रुपयाचा दंडही भरला भरावा लागणार आहे. याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यांस दंड होता. परंतु आम्ही मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावणे अनिवार्य करणार आहोत असेही यावेळी नितीन गडकरी म्हणाले तसेच कारच्या मागील सीटवर बेल्ट न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी संबंधित फाईलवर सही करीत म्हणाले.