दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कंधार तालुका अध्यक्ष बालाजी माधवराव पाडागळे यांनी दिपावली निमित्ताने मारतळा ग्रामीण मराठी पत्रकार संघ ,उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ शिराढोण मराठी पत्रकार संघाचा स्नेहभेट हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोज शनिवार ह्या दिवशी आयोजित केला होता.स्नेहभेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने चहा फराळाचे आयोजन करण्यात आले होते.व यावेळी बालाजी पाटील पांडागळे यांनी पत्रकार बांधवाशी विविध विषयांवर चर्चा केली .या चर्चेमध्ये शिराढोण सर्कल सह कंधार तालुक्यात महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेल्या कामाची माहिती दिली यामध्ये बहादरपूरा येथील मन्याड नदीवरील पूलाची मंजूरी ,हानंमत वाडी येथील नदीवरील पूलाची मंजूरी व उस्माननगर, शिराढोण येथील उर्वरित रहीलेल्या कॅनॉलच्या कामाला देखील मंजूरी मिळाली असून हे काम पाईपलाईन द्वारे होनार आहे व या कामाची निविदा काही दिवसात निघणार आहे अशी माहिती पत्रकारांना दिली आहे.त्यानंतर काॅग्रेस कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना बोलताना म्हणाले चालू असलेल्या भारत जोडो पद यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे ही भारत जोडो पदयात्रा १६५ दिवस व 3 हजार ५०० कि.मी.पायी असून महाराष्ट्रातील आपल्या नांदेड जिल्ह्य़ातून दि.७ नोव्हेंबर पासून जात आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे भाग्य असून आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार रहाणार असल्याचे यावेळी बालाजी पाटील पांडागळे म्हणाले .यावेळी शिराढोण येथील सरपंच खुशाल पाटील पांडागळे ,मारतळा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश ढेपे,उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे,शिराढोण ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष क-हाळे ,कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव बाळासाहेब रामराव पवार,नागोराव पाटील आलेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दत्ता पाटील शिंदे,दहिकळंबा येथील उपसरपंच अवधूत शिंदे,भूत्याचीवाडी येथील सरपंच माधव पाटील भत्ते, काॅग्रेस कार्यकर्ते अशोक पाटील काळम,उस्माननगर सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, माजी सरपंच अमिनशहॅ फकिर,उस्माननगर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव पांडागळे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
भिमाशंकर म. विद्यालय शिराढोण येथील प्रा. विजय भिसे यांनी केले तर आभार कमलाकर पाटील शिंदे यांनी मानले.