दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा प्रधानमंत्री पीकविमा भरला.सुरुवातीला अतिवृष्टी आता परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे अति नुकसान झाले.तालुक्यातील पात्र शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्याचे पीकविम्याकडे लक्ष लागले आहे. गेल्या दोनतीन वर्षा पासून कोरोनाकाळं,लोकडाऊन, दुष्काळ, बेमोसमि पाऊस या परस्थितीचा शेकऱ्याला सामना करावा लागला यावर्षी मोठ्या अशाने जोमाने शेतकर्यांनी पेरणी केली कि यंदा पाऊस पाणी बरा होईल. परंतु पावसाने सुरुवातीपासून जोर धरला अतिवृष्टी झाली परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आणि शेतकऱ्याच्या आशाची निराशा झाली. तालुक्यात अतिवृष्टीमुळे स्वयाबीन,कापूस, मूग, उडीत, तुवर या पिकांचे अति नुकसान झाले. विशेahaस्वायाबीन, आणि कापसाचे 80ते 90%नुकसान झाले.त्या पार्शवभूमीवर पीकविमा मिळणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले होते.त्यामुळे कंपनीने काही शेतकऱ्याचा विमा मंजूर केला.पहिल्या टप्प्यातील रकमा बँक खात्यात वर्ग करण्यात आल्या.मात्र तालुक्यातील 75%शेतकरी पीकविम्याच्या रकमेतूपासून वंचित राहिले आहे.दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्यांना बँक खातात रक्कम जमा करण्यात येणार अशी माहिती सांगण्यात येत आहे.आता रब्बीच्या पेरणीला शेतकरी लागले आहे त्यासाठी पेरणी,बियाणे, खत खरेदीसाठी पैश्याची गरज आहे त्या कारणाने शेतकरी पीकविमाण्याची मागणी करीत आहे.तक्रार करुंनही त्याची दखल घेतली जात नाही शेतकरी गजानन प्रकाश दवणे यांचे म्हणणे आहे.पत्नीला पीकविमा रक्कम खात्यात जमा मला मिळाली नाही दोघांची एकाच गटात जमीन तक्रार सोबत केली पंचनामा सोबत केला पंचनामा करणारा कर्मचारी एकच पीक सारखेच आहे.शेतकरी राजेभाऊ दवणे यांनी ही माहिती दिली त्यांनी जिल्हा प्रशासनाणे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळून द्यावी ही मागणी केली.