दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना संस्थेने (एनसीएफ) बारावीच्या बोर्ड परीक्षा वैकल्पिक आणि वर्णनात्मक अशा पद्धतीत वर्षातून दोन वेळा घेण्याची शिफारस केली आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या अंतिम निकालात त्यापूर्वीच्या म्हणजेच अनुक्रमे नववी व अकरावीतील गुणांचाही विचार व्हावा, अशी आखणी करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या शिफारशी स्वीकारण्यात आल्यास राज्यातील परीक्षांचे स्वरूपही बदलणार आहे.
सन २००५ नंतर प्रथमच देशातील अभ्यासक्रमासाठी नवी संरचना तयार करण्यात येत आहे. यामध्ये नववी ते बारावीच्या परीक्षांबाबतच्या दूरगामी परिणामकारक शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशी लवकरच सार्वजनिक मंचावर ठेवण्यात येतील व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यांवर विचार करून अंतिम परीक्षा रचना करण्य