दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: देि.२८.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने निवेदन देण्यात आले.यामधे अत्यंत गंभीर बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे.हल्ली शिक्षण घेणे म्हणजे सोनं विकत घेण्यासारखे झाले आहे.परंतु प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या पाल्याने चांगल्या शाळेत शिकून मोठ्ठं व्हावं अन् चांगल जीवन जगावं. पण हे त्या आईवडिलांना चांगलच महागात पडत आहे.कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना,१००-२०० रुपयांनी मजुरी करणाऱ्या मजुरांना व मध्यमवर्गीयांना स्वतःला गहाण ठेऊन मुला- मुलींचे शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. हे फार दुर्दैवी आहे.करिता अमर रमेश पाटील संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष नांदुरा यांनी आज दिनांक २८ मे २०२२ रोजी जळगाव जा. येथे बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना निवेदन दिले. व शासकीय मराठी शाळांचा दर्जा सुधारून खाजगी शाळेत ज्या-ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या शासकीय मराठी शाळांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.जेणेकरून गोरगरीब जनतेला आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मोफत मिळेल व त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल व या विषयावर बच्चू कडू साहेब यांनी सकारात्मकता दर्शविली.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील,तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कुटे,तालुका उपाध्यक्ष सचिन बाठे,जिजाऊ सावित्री विचार मंचचे अध्यक्ष श्री अशोकराव घनोकार,श्री रामकृष्ण पाटील,निलेश पाटील उपस्थित होते.