दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
जिल्ह्यातील राजकारणात ‘प्रताप पर्व “सुरू झाले.इथं पर्यंतचा जवळपास तीन दशकांचा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे .जिल्ह्याचे नेते खा चिखलीकर साहेब यांना जसा संघर्ष करावा लागला त्याग करावा लागला तीच राजकीय परिस्थिती युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यावर आली .संयम श्रद्धा व सबुरी ठेवत त्यांनी आपला विजय मामांच्या गळ्यात टाकला पण निवडणून आल्या नंतर त्यांनी आपले रंग दाखवले.पण नातं आणि राजकारण या दोन्ही पातळीवर अंत्यत संयमाने वागणारे प्रवीण पाटील यांचा जिल्ह्यात राजकीय रणनीतीकार म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो .उभरते नेतृत्व आगामी काळात लोहा कंधारच्या राजकारणात नव्या पिढीच्या प्रवीण पाटील यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत .आज ४ ऑगस्ट त्याचा वाढदिवस त्या निमित्ताने अभिष्टचिंतन
लोहा- कंधार तालुका हा जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला.विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी आमदार होण्याची संधी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सोडली .त्यांच्या या त्यागाची- संयमाची खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली. राजकारणा मुळे .कुटुंबात “वाद” नको.असे म्हणत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घ्यायला सांगितले आणि त्यांनी आदेश मानला विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांचा विजय होणार (?) अस वातावरण मतदारसंघात होते..मागील पराभव झाला त्यामुळे सहानुभूती होती.तर भाजप-शिवसेना युती मुळे खासदार प्रतापरावांना श्री शिंदे यांच्या प्रचारात उतरता आले नाहीं शेवटच्या आठ दिवसात प्रवीण पाटील यांनी सगळी सूत्रे हाती घेतली.संपूर्ण मतदारसंघाची खडानखडा माहिती आणि कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ . त्यामुळे शेवटच्या तीन दिवसात सगळं वातावरण बदलून टाकलं
२००९ च्या लोहा विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर अशी लढत राज्यभर गाजली .या निवडणुकीत स्वतः प्रवीण पाटील यांनी सर्व नियोजन केले होते . मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ निवडणूक लढविणे लेचपेचाचे काम नाही.जागोजागी अडवणूक. पोलीस कार्यवाही या सगळ्याला तोंड देत कार्यकर्ते -जनता यांच्या पाठबळावर त्या निवडणूकीत चिखलीकर परिवाराने मोठ्या धीरोदत्तपणे याचा सामना केला
.थोडक्यात विजय हुकला .या सर्व घडामोडीत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी जे अनुभव घेतले राजकीय डावपेचांना तोंड दिले.. सहन केले या निवडणुकीने त्यांना खूप काही शिकवले शिवाय पहिल्याच जि प निवडणुकीत प्रखर विरोध आणि त्यातून खेचून आणलेली विजयश्री त्यामुळे प्रवीण पाटील यांना राजकीय परिपक्वता कसलेल्या नेत्या सारखी आहे
साहेबां सारखी सहनशक्ती..संयम.- – सहकार्य त्यांच्या राजकीय जीवनात उपयोगी पडले आहे.त्यानंतर त्यांनी स्वतः वडेपुरी ची जिल्हा परिषद निवडणूकीत .सर्व विरोधक विरुद्ध चिखलीकर लढत तशी नवी नव्हती पण राजकीय दृष्टया प्रतिष्ठेची होती शिवाय साहेब पराभूत झाले होते स्वतः प्रवीण पाटील यांनी गावोगावी जाऊन स्वतः नियोजन केले आणि यशश्री मिळविली
. कंधार -लोहा नगरपालिका, दुसऱ्यांदा जिल्हा परिषद शिराढोण ,कंधार मधील दीड वर्षापूर्वीची जिल्हा बँकेचे निवडणूक प्राणिताताई यांचा वडेपुरी गट या सगळ्या निवडणूकीत आणि २०१४ च्या चिखलीकर साहेबांच्या ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीत प्रवीण पाटील यांचे नियोजन ” हमखास ” विजय घेऊन आले.
लोकसभा निवडणुक ..बहुतेक मतदार संघात नवीन ..नवे कार्यकर्ते..नवा पक्ष..नवे संघटन या सगळ्याची अतिशय व्यवस्थित सांगड घालीत या युवा नेत्यांनी राज्यात लक्ष्यवेधी विजयाला गवसणी घातली
.प्रवीण पाटील बोलत नाहीत तर करून दाखविता..एक असा युवा नेता की जो मोठ्या माणसांचा अतिशय आदर करतो ..कुटुंब कुटुंबातील नातीगोती, बंधू ऍड संदीप पाटील, सचिन पाटील , बहिणी, भाऊजी, दाजी असा सर्वाना जीव लावणारा कुटुंब वत्सल युवा नेता आहेत
वडीलधा ऱ्यांनी , अधिकाऱ्यांनी हाक मारली तर . “जी” म्हणणार . असा नम्र स्वभाव .विरोधकांनाही आदराने बोलणारे प्रवीण पाटील यांनी सोशल मीडियावर विरोधात आलेल्या कमेंटवर कधीच त्या व्यक्तींना अपशब्द काढला नाही .अनेकदा चिखलीकर साहेबांच्या विरोधात कमेंट येतात पण कोणासही कधीच प्रवीण पाटील यांनी त्याला टोकले नाही
विधानसभा निवडणुकीत स्वतः आमदारकी आपल्या नेत्यांच्या आदेशानुसार लढविली नाही उलट तन-मन-धनाने प्रवीण पाटील आणि प्राणिताताई या बहीण भावाने आपली सर्वच यंत्रणा कामाला लावली आणि शिंदे साहेब यांची स्वप्नपूर्ती झाली
अडीच वर्षा पूर्वी राज्यात भाजप-शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडी सरकार आले .त्यानंतर आ शिंदे यांनी आघाडी सरकारला पाठींबा दिला आणि हळूहळू ते प्रतापराव विरोधकांच्या गोटात सामील झाले तेथूनच .या दोन्ही नेत्यांच्या ” नात्यात” दरारा पडली . प्रवीण पाटील व प्रणिताताई या बहीण भावाने एकही शब्द त्यांच्या विरुद्ध
काढला नाही.संयम ढळू दिला नाही ..मागील काळात घडलेल्या घटनेत
सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी प्रवीण पाटील चिखलीकर पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले . “नातं ” गौण ठरलं आणि कार्यकर्ताचे नाते दृढ झाले
ज्यांनी निवडून आणले तेच विरोधक असे आ शिंदे व समर्थक मानायला लागले . त्यांच्या विजयी रथाचे “सारथी” युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले होते कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आणि आता राज्यात सत्तांतर झाले त्यामुळे येत्या काळात आमदार यांच्या समोर युवा नेते प्रवीण पाटील यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.जिल्हा परिषदेत तिसऱ्यांदा जाण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही; कधी कधी तर ध्येयपूर्ती होणार हे जवळपास निश्चित असते पण अचानक असे काही घडते की नाईलाज होतो आणि विजयी माळ आपल्या हाताने इतरांच्या गळ्यात घालावी लागते .असा वेळी श्रद्धा -सबुरी ठेवून निर्णय घेणार नेतृत्व कसोटीवर उरते आणि कोणतीही आदळआपट न करता आदेश शिरसंवाद मानावा लागतो असेच काही युवा तेथे..मॅनेजमेंट गुरू..रणनिती कार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या बाबतीत घडले. पण
आता त्यांच्या कडे हा मतदार संघ मोठ्या आशेने पाहतो आहे
सतेतून पाय उतार झाल्या नंतर महाविकास आघाडी तील घटक पक्ष एकजुटीने भाजपच्या विरोधात लढतील असे सध्या दिसत नाहीत
स्वतः प्रवीण पाटील यांच्याकडे स्वतःच्या कडे निवडणूक लढविण्याचा मोठा अनुभव आहे लोहा तालुक्यात सहा गट आरक्षित झाले आणि कंधार मध्ये कौठा गट खुला झाला .या गटात प्रवीण पाटील चिखलीकर यांनी तयारी सुरू केली पण विरोध म्हणून आ शिंदे यांनी त्याचे चिरंजीव यांनाही येथून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली.प्रवीण पाटील यांनी अडीच वर्षा पूर्वी जर त्याग केला नसता आणि अपक्ष निवडणूक लढविली असती तर कदाचित चित्र वेगळेच असते .आता या मतदारसंघात प्रवीण पाटील यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याच्या मानसिकतेत येथील मतदार दिसतो आहे येत्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण पाटील यांनीच उमेदवार असावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करताहेत.विविध प्रसंगांचा धीरोदात्तपणे सामना करणारे युवा नेते रणनीतीकार प्रवीण पाटील चिखलीकर याना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांना या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो याच मनपूर्वक सदिच्छा…!
सचिन मुकदम -चव्हाण
रत्नाकर महाबळे