दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : काल भेटल्यानंतरही आम्हाला एक विश्वास त्यांच्यात दिसला की, जो उमेदवार ते देतील. तो उमेदवार निवडून येईल. शिवसेनेनंही अनेकदा करून दाखवलं आहे. ४० जण गेलेत, त्यातील ४-५ जण सोडले, तरी बाकीचे निवडून येणं अवघड आहे. फुटलेल्या आमदारांनीही हा विचार केलेला असणार आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘बंडाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांची वेळ न देण्याची पद्धत, न भेटण्याची पद्धत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात विशिष्ट पद्धतीने काम करण्याची सवय होती. तशी पद्धत उद्धव ठाकरेंकडे नव्हती. त्यातून तक्रारी येत होत्या. पक्षाचे नेते म्हणून चांगले आहेत, पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं आकलन काय?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.