दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदान गेल्या सहा महिन्यांपूर्वी पासून रखडलेले असल्यामुळे जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांवर जीव देण्याची पाळी आली आहे.तालुक्यातील एक शेतकरी आत्महत्या करिता गेला असता त्याला मित्र मंडळीने समज घालत तू चुकीचे पाऊल उचलू नको यातून काही मार्ग निघेल म्हणून अडविले व त्यानंतर त्या शेतकऱ्याला शेतात पीक घेण्यासाठी पैसे दिले.कृषी अधिकारी तराळ यांना ग्रामीण रोजगार हमी योजने संबंधित सतत पाठपुरावा करून सुद्धा केवायसी मुळे शासकीय खाते बंद असल्याने पैसे परत गेले व मी नवीनच कृषी अधिकारी म्हणून रुजू झालो तसेच ही आमची चुकी नसून बँकेची आहे अश्याप्रकारची उडवा-उडावीचे उत्तरे मिळाली असता शेवटचा पर्याय म्हणून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ११:०० वाजता जल व अन्नत्याग उपोषण सुरू केले असता दुसऱ्या दिनी १५ ऑगस्ट भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस या दिवशी जर देशाचा अन्नदाता उपोषण करेल तर आपली नोकरी धोक्यात येवू शकते म्हणून कृषी अधिकारी यांना घाम फुटला.शेतकऱ्यांनी व सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी अंजनगाव सुर्जी यांच्या कार्यालयाला घेराव घातला असता कृषी अधिकारी तराळ यांनी तहसीलदार अभिजीत जगताप यांना संपर्क केला.तहसीलदार यांनी उपोषणस्थळी येऊन येत्या ७ सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन देऊन अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची बाजू मांडून छाप ठेऊन शेतकऱ्यांचे उपोषण सोडविले.