दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक बारूळ येथे होत आहे संस्थेचे येथील बहुतेक वर्ग हा शेतीवर आधारित आहे आणि या शेतकऱ्याच्या जीवनदायी म्हणजेच सोसायटी अंतर्गत येणारी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधने पण आज पर्यंत च्या काळात येथील सोसायटीचा सदस्य हा नामधारी राहिला आहे संस्थेच्या सदस्याचा आणि त्यांचा आसपासच्या समुदायास च्या आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेणे हा सहकारी संस्थेच्या उद्देश असतो पण येथील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयांना वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून बगल देण्यात आली होती सोसायटी अंतर्गत या मनमानी च्या विरोधात येथील जनतेतून आवाज उठवित सर्वानुमते शिवकृपा सहकार पॅनेलच्या माध्यमातून नवयुवक व ज्येष्ठ उमेदार देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी चे पॅनल मैदानात उतरले आहे आणि मतदारांनीही या शिव कृपा पॅनल भरभरून पाठिंबा दिल्यामुळे मतदारांची पाठिंबा वाढला आहे आधीच शिवकृपा पॅनेलचे दोन उमेदवार शिवाजी अंतापुरे व पद्माकर बकवाड बिनविरोध निवडून आले असून उर्वरित दहा उमेदवारासाठी शिवकृपा पॅनल निवडणूक लढवीत आहे या पॅनलचे कपबशी निशाणी असून यामध्ये नवयुवक व सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील मजरे शहाजी नाईक वंसत ईटकपल्ले श्रीमती गयाबाई रामराव शिंदे मारुती इटकापल्ले नारायण कोल्हे बालू सिंग ठाकूर सौ.सुनीता बाई कुंदरुपे किशन कांबळे शहाबुदीन शेख उमेदार असून दिनांक 20 ऑगस्ट रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा बारूळ येथे मतदान होणार आहे स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा सोसायटी साठी बारूळ नगरीत निवडणूक होत असल्यामुळे सर्व सभासदाचे व नागरिकाचे याकडे लक्ष लागले असून त्यामध्ये शिवकृपा पॅनलचा जोर सध्या दिसून येत आहे.