दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
औरंगाबाद– आज काल वाहन क्षेत्रा मधे काम करणार्या वाहन चालक, चालक-मालक यांचेवर कधी टोल नाक्या वरील कर्मचार्यांच्या कडून,तर हायवे पोलीस कर्मचार्या कडून तर कधी फायनस कंपनीतील वसुली पथकातील कर्मचार्यांच्या कडून दिवसेंण दिवस अन्याय अत्याचाराची वाढ होतांना दिसते आहे.मागील वर्षी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर इंडसन फायनस कंपनीच्या भागवत दसपुते नावाच्या बैंक मैनेजरने त्याचा रेकाँर्डवरील गुन्हेगार भाऊ दिपक दसपुते व इतर चार गुंड वृत्तीच्या तरूणांना शस्त्रांअत्रासह सोबतीला घेऊन रात्री उशीरा घरी जाऊन जिवघेणा हमला केला केला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून श्री संजय हाळनोर व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हाळनोर यांनी संबंधित पुंडलीकनगर पोलीस स्टेशनचे (औरंगाबाद) पोलीस निरिक्षक श्री घनश्याम सोनवणे,पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे ठाणे मालदार श्री पल्हाळ साहेब तसेच 100 या नंबरवर वारंवार फोन करूण देखील संबंधीत पोलीस स्टेशनच्या कर्तव्यावर आसणारे पोलीस कर्मचारी श्री हाळनोर यांच्या मदतीला पाठवले गेले नव्हते.त्या मुळे हल्लेखोर हल्ला करूण पळूण जाण्या मधे यशस्वी झाले होते.
त्यानंतर हाळनोर यांची फिर्याद लिहून घेण्यास व आरोपीस अटक करण्यास जाणुन बुजुन दिरंगाई करण्यात आली होती.पोलिस निरिक्षक श्री घनश्याम सोनावणे व पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यावर आसणार्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर त्यांचे कर्तव्यात कसूर केली नसती व गुन्हेगारांवर वेळीच कठोर कार्यवाही केली आसती तर फायनास कंपनीच्या वसूली पथाकातील गुंड प्रवृतीच्या गुंडांना कायदाचा धाक वाटला आसता व मागील महिण्या मधे पारोळा जि.जळगाव येथील ट्रक चालक श्री शोभीलाल यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती व त्याचा संसार उघड्यावर पडला नसता.परंतु पोलीस खात्यातील काहि भ्रष्ट पोलीसांच्या चुकीच्या वर्तुणूकी मुळे फायनस कंपनीच्या गुंडाची गुंडेगिरी दिवसें दिवस वाढते आहे.
फायनस कंपनी कडुन होणार्या आर्थिक लूटिला व दादागीरीला थोड्या फार प्रमाणावर का होईना परंतु आळा बसावा या प्रामाणीक हेतूने जय संघर्ष संस्थेच्या वतीने मागील सहा वर्षा पासून सरकारकडे चालकांच्या कल्याणकारी महामंडळाची मागणी लावून धरण्यात आलेली आहे.
सदरच्या मागणीची विद्यमान महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन महामंडळाची त्वरीत आमल बजावणी करावी तसेच मागील दोन वर्षा पूर्वी घोषीत केलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना पण चालू करावी.त्याच बरोबर आँनलाइन चालान मुळे पण चालक वर्ग त्रस्त झालेला आहे.त्यावर पण केंद्र सरकारनें फेर विचार करूण ते बंद करावेत,मागील अनेक वर्षांपासून आँटोरिक्षाची न झालेली मीटर दरवाढ करण्यात यावी,जिप या प्रकारा मधे येणार्या परवाना धारक वाहनांची आसन क्षमता वाढवण्यात यावी,वाहन चालकांसाठीच्या सन्मानासाठी 17 सप्टेंबर हा चालक दिन मणुन सरकारच्या वतीने अधिकृत घोषीत करण्यात यावा,रोडवर गंभीर आपघाती,50 टक्के किंवा 100 टक्के कायम स्वरूपी आपगंत्व आलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या चालक व क्लिनर यांच्या परिवारासह सरकारच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी तसेच वाहन चालकाला होणार्या मारहाणीस कायम स्वरूपी आळा बसावा मणुन कायद्या मधे कठोर तरदूत करण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन दि.01 सप्टेंबर 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आसून दि.15 सप्टेंबर 2022 पर्यंत आमच्या रास्त मागण्यांचा सरकारच्या वतीने जर सकारात्मक विचार नाहि केला गेला तर ट्रैक्टर पासून ट्रक पर्यंत व रिक्षा पासून बस पर्यंतच्या अनेक संघटनाच्या वतीने दि.16 व 17 सप्टेंबरला औरंगाबाद येथे भव्य आसे आंदोलन केले जाईल आसा इशारा औरंगाबाद संघर्ष कृती सामंती व जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरच्या निवेदनावर संघटना अध्यक्ष श्री संजय हाळनोर,संतोष काळवणे,सोमनाथ गायकवाड,निखिल कुलकर्णी,लक्ष्मण शेंडगे,अब्बासभाई पठाण,लक्ष्मण वाघ,लक्ष्मण सोनवणे,संजय नलावडे,रविंद्र सुरडकर,सागर राजपूत,अशोक तिवारी,अमोल तावरे,कल्याण खताचे आणि अनिल मते इत्यादींच्या सह्या आसून संघर्ष कृतीला समितीचे ,शेख सरवर कँप्टन,नजिरभाई,खाँजाभाई,मनोज जैस्वाल इत्यादिंच्या सह्या आहेत.