दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
मागिल ३ महिन्यांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतातिल विजेचेपोल पडल्यामुळे जुन पासुन शेतकर्यांची शेतातिल विद्युत खंडित आसुन चैनपुर व अंतापुर येथिल शेतकर्यांचे आतोआत नुकसान होत आहे. शेतामध्ये बोरवेल आसुन देखिल दिद्यतअभावी शेतातिल ऊभा सोयाबिन करपुन जात आहे. वेळोवेळी विद्युत अभियंता नरंगल तसेच देगलुर येथे संपर्क केला आसता फक्त आज ऊद्गा करुन वेळ काढुपणाची भुमिका घेत आहेत. तरी आज रहिम शेख विद्युत अभियंता (शाखा नरंगल) यांना धमकी वजा निवेदन देण्यात आले आहे. तात्काळ विद्युतजोडणी नाही झाल्यास चैनपुर, अंतापुर येथिल गावकरी रस्तावरुन उतरुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला. यावेळेस गावातिल नागरिक बालाजी शेळके, सुभाष पाटिल, माजी सरपंच हानमंतराव पाटिल, मल्हारी भोईवार, गंगाधर शेळके, पोलिस पाटिल उत्तम जाधव, रघुनाथराव डोपावार, सुर्यकांत धनुरे, गंगाधर भोईवार, सुरज पाटिल, मेहबुब शेख, माजि सरपंच रज्जाक मिरासाब, योगेश जाधव, गंगाधर कारेगावे, दिगांबर रेड्डी, नामदेव डोपेवार, चांदुबाबा भोईवार आदी शेतकरी उपस्थित होते.