दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सृष्टी वर अशक्य अस काहीच नसतं.पण त्यासाठी खडतर संघर्ष करत अहोरात्र मेहनत घेतली गेली पाहिजे.आणि सातत्य टिकवून ठेवल पाहिजे यश हे एक दिवस नक्कीच मिळेल या मध्ये तीळमात्र शंका नाही. अपयश हि यशाची पहिली पायरी असते. दगड हा कधी पहिल्या घावात तुटतो तर कधी कधी अनेक घाव घालावे लागतात.दगड शेवटच्या घावाने तुटला तर पहिला घाव व्यर्थ जात नाही.महणुन दगड तुटेपर्यंत प्रयत्न थांबवता कामा नये.यशाच्या संदर्भातील संकल्पना, परिकल्पना, व्याख्या हि प्रत्येकाच्या दृष्टीने अनुभवातून वेगळी असते . अपयशाचे पण तसेच आहे. म्हणजे यश अपयश याचे मुल्यमापन हे प्रत्येकाच्या साठी सारखं नसतं . कुणाला अगदी पाहिल्या प्रयत्नात यश मिळत तर अनेकांच्या बाबतीत अगदी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर यशाचा ताळमेळ लागतो . अनेकदा दगड हा पाहिल्याच घावात तुटतो .तर कधी कधी अगदी शेवटच्या घावाने तुटतो .आता पहिला घाव आणि शेवटचा घाव या मधील अंतर सुद्धा वेगळं असत . फक्त निरंतर प्रयत्न केले तर मग मात्र पहिला घाव व्यर्थ जात नाही.हे वास्तव आहे .अन्यथा प्रयत्न खंडीत झाले . मध्येच धेय्य बद्दल झाला .आपण थकलो . किंवा प्रयत्न करण्याचा नाद सोडला .तर मग मात्र पहिला घाव व्यर्थ गेला म्हणून समजा . आणि पहिला घाव व्यर्थ जाऊ देयचा नसेल तर प्रयत्ना मध्ये सातत्य टिकवून ठेवणं आवश्यक आहे.महणुन कोणताही प्रयत्न हा अंतिम प्रयत्न कधीच नसतो .पहिल्या घावात दगड तुटतोच असं नाही .कधी कधी पहिल्या घावात दगड तुटतो .तर कधी कधी अनेक घाव घालावेच लागतात . तेव्हा कुठे शेवटच्या घावात दगड तुटतो. मग शेवटच्या घावात दगड तुटला म्हणजे आपला पहिला घाव व्यर्थ गेला का तर नाही गेला .पहिल्याच प्रयत्नात यश पदरात पडेल अस खुप कमी लोकांच्या बाबतीत घडतं . मग पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही म्हणून प्रयत्न बंद करायचे का ? तर नक्कीच नाही. आपण प्रयत्न बंद केले तर आपला पहिला घाव व्यर्थ जाईल . आणि दगड फुटतच नाही .असा आपल्या सह अनेकांचा समज होईल .पण हा समज सत्य नाही . म्हणून अनेकदा यश मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सातत्य टिकवून ठेवल. तर शेवटच्या क्षणी यश पदरात पडत.म्हणून पहिला प्रयत्न केल्यानंतर यश मिळेपर्यंत अंखडीत पणे प्रयत्न चालू ठेवा .यश हे मिळणारच या मध्ये काहीही शंका नाही.पहिला घाव घातला आणि घाव घालण बंद केलं तर दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जाऊ शकत नाही.किंवा शेवटाचा अंतिम घाव घालण्या आगोदरच आपण प्रयत्न बंद केले तरीही दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जाणार नाही.पहिल्या घावा पासुन शेवटच्या घावा पर्यंत सातत्याने अंखडितपणे प्रयत्न चालू ठेवले तरच दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जातो .हे अगदी सरळ सरळ गणित म्हणजेच पहिला घाव हा कधीच व्यर्थ जात नाही.हे जरी सत्य असल तरी पण शेवटच्या घावा पर्यंत प्रयत्न बंद नाही झाले पाहिजे.तरच आपल्या पहिल्या घावाला महत्व आहे.महणुन दगड हा कधीही शेवटच्या घावानेच तुटतो .याचा अर्थ असा होत नाही कि आपला पहिला घाव हा व्यर्थ जातो . हिच समांतर परिस्थिती आपल्या जीवनातील आहे. आपण आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो . तेव्हा काही लोकांना अगदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळत . आणि काही लोकांच्या वाट्याला अपयश येत.आता ज्यांच्या बाबतीत अपयश आलं त्यांनी निराश नाराज नाही झालं पाहिजे.आणि तणाव न घेता आपल्याला ज्या संदर्भात यश मिळवायचं आहे .त्या अनुषंगाने अंखडीत प्रयत्न बंद न करता.नियमित पणे सातत्य ठेवुन नियमित प्रयत्न केले पाहिजे.जेणेकरून आपला पहिला घाव व्यर्थ जाणार नाही . आपण सातत्याने प्रयत्न केले तर एक दिवस यश आपल्याला नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.पण कधी तर आपल्या प्रयत्नांमध्ये खंड पडला नाही तर आणि जर खंड पडला तर मग मात्र आपला पहिला प्रयत्न व्यर्थ जाईल . म्हणून प्रयत्न करत असताना एकदा सुरुवात केली कि यश पदरात पडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने थांबलं पाहिजे.मग विषय कोणताही असो. दगड तुटतोच प्रयत्न थांबले नाही पहिजेत तसंच यश हे मिळतच पण प्रयत्ना मध्ये सातत्य टिकवून ठेवल. आणि प्रयत्ना मध्ये खंड नाही पडला पाहिजे.महणुन सुरवातीचा पहिला प्रयत्न ते यश मिळेपर्यंतचा प्रयत्न हाच यशाचा प्रवास आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301