दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;!
आर्णी तालुक्यातील शेलू शे.येथे काल मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला,वादळी वाऱ्यासह पडले पावसामुळे आपल्या शेतात काम करणाऱ्या सेलू येथील एका शेतकरी पुत्रावर विज पडल्याने शेतकरी पुत्र जागीच ठार झाला,मृत्यूक शेतकरी पुत्राचे नाव रविकांत तुकाराम राठोड वय २५ वर्ष असुन शेलू येथे त्यांच्या मालकीची तिनं ऐक्य शेती आहे आपल्या शेतात काम करताना त्यांच्या अंगावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला,१ त्यांच्या मागे पत्नी, मुलबाळ आई, बाबा आहे हा आपल्या मोठ्या भावासोबत शेतातील काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला पावसाच्या पाण्यामुळे दोघे भाऊ हे शेतातील गोठ्यात आसरा घेण्यासाठी धाव घेतली असता मृतक गोठ्या शेजारी हा उभा होता मोठा भाऊ हा बसून होता.दोघे एक मेका सोबत बोलत असताना अचानक वीज कडाडली व काही वेळातच होते चे नव्हते झाले.सोबत असलेल्या मोठ्या भावाने तात्काळ लोनबेळ येथील आरोग्य केंद्रावर नेले असता तो बेशुद्ध असल्याने त्याला तात्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी रविकांतला मृत घोषित केले.या बाबतची फिर्याद आर्णी पोलीस स्टेशनला मृतकाचा मोठा भाऊ अविनाश तुकाराम राठोड वय ३३ वर्ष राहणार शेलू शेंदूरसनी यांनी दिली असून आर्णी पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून शवइच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे.पुढील तपास बिट जमादार अरुण चव्हाण हे करीत आहे.