दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी २००६ पासून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापन केली तेव्हापासून पोट निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पर्यंत उमेदवार दिलेला नाही, आमचे नेतृत्व लोणी खाणारे नेतृत्व नाही *जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले संतांनी सांगितलेला आहे* राजकारणाला *राजकीय आखाडा नाव जरी असले तरी आपले नेतृत्व मनसे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे हे विरोधाला विरोध म्हणून राजकारण करीत नाहीत* मा.साहेबांचे लक्ष एकच तुम्ही कधीच बघितलेला नाही असा महाराष्ट्र घडवून दाखवील म्हणून जनतेच्या हितार्थ आपण कधीच बघितलेले नाही असा महाराष्ट्र बघणार आहोत, *या सोबतच अस्मिता मराठी नख लावले तर मराठी म्हणून अंगावर येईल, हिंदुत्वाला नख लावले तर हिंदू म्हणून अंगावर येईल असे त्यांनी जाहीर पणे सांगितल्याले आहे* म्हणून ही भूमिका घेऊन मा.राज साहेबांनी अंधेरी पोट निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवार दिला नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मनसे अध्यक्ष यांनी मा.देवेंद्रजी फडवणीस यांना पत्र लिहून विनंती केली होती अंधेरी पोट निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा आपल्या पक्षाने उमेदवारी देण्याबाबत विचार करावा राज साहेबांच्या आव्हानाला विनंतीला मान देऊन मा. देवेंद्रजी फडवणीस यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला अर्ज परत घेतल्यानंतर श्रीमती ऋतुजा लटके यांचा विजय निछित झाला होता, म्हणून आज त्या अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून देखील आल्या श्रीमती ऋतुजा लटके यांचे मनापासून अभिनंदन! *मी एक गोष्ट ठामपणे सांगतो माझं नेतृत्व हलकट नाही नेता असावा तर असा* म्हणून येणारा काळ मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांचा असेल हंगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व महाराष्ट्र राज्यासह मुंबई,नाशिक,पुणे,संभाजीनगर, नागपूर,या शहरांमध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापौर दिसतील महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असेल कारण सध्याची परिस्थिती पाहता इतर पक्ष आपसातील जिरवा जिरवीच्या भानगडीत आहेत कोण कोणासोबत जाते कोण कोणाचे आमदार फोडून याच भानगडी त्यांच्या चालू आहे, मा.राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे विकासाचे व्हिजन ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर ठेवून मत मागितलेले आहेत काळ वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही असे आपले पूर्वज म्हणत होते आता तो काळ आणि वेळ आलेली आहे…