दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी –
विश्वासाचं एकदा पानिपत झालं की, कितीही गड आले अन सिंह गेले यानी रायगडाला जाग येत नाही. अश्रुंची झाली फुले असं मनांत असतानासुद्धा वाडा चिरेबंद का अश्रुच गाळत बसतो ? हा प्रश्न मला पडतोच! साद देती हिमशिखरे जेव्हा वातावरण बदलामुळे विरघळायला लागतात अन भविष्यात तप्त वातावरणात आता कसे जगायचे ? हा प्रश्न आ वासून उभा रहातो तेव्हा म्हणावं का? जीवनात ही घडी अशीच राहू दे………. ! असा संशय कल्लोळ मनांत दाटुन आलेला असताना चार दिवस सासूचे की चार दिवस सुनेचे गोड गोड वाटतात हा ही प्रश्न विचारावासा वाटतो ! बहुत दिन नच भेटलो सुंदरीला हे असे का उगाच मनात येत असतं काही कळत नाही. खर तर आता या ” जिंदगी ख्वॉब है ” या वयात ” कही दूर जब दिन ढल जाये” असा अस्ताला जाणारा रविराज अबोली नारंगी देखावा जिवंत डोळ्यासमोरून सरकताना दुसरी घंटा झाल्याचा आवाज कानावर पडतो अन मी स्वतःला सावरून सावर रे सावर रे असा तीसऱ्या घंटेची वाट पहात ” कधी रे येशील तू ” असा संभ्रमित होतो अन ” फुलले रे कण माझे” असे त्या तिसऱ्या घंटेने होते. नाजुक मुलायम पदडा दोन्ही बाजूला अलवार जाऊन त्या मंचावर उगवणारी पहाट ” पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली” याची चुटपुटशी जाणिव मनाला गुलाबी स्पर्शुन जाते अन मी आता काय बरं घडणार या उत्सुकतेमधे जाग येऊन लक्ष एकाग्र केंद्रित करायचा एक प्रयत्न करतो. ” दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे” या पन्नास वर्षांपुर्विच्या पिंपळपानाची सजग आठवण, सय तितक्याच पिंपळाच्या झडाच्या सळसळाटून सळसुळून जाते अन रंगमंचावर “एक एक नक्षत्रांचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना ” या ओळी मंद सूरात मंद आवाजात ऐकू येतात अन ……………. ” तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे” या सुखप्राप्तीत मनाचे अलवार सूर कसे लागून जातात हे नकळत कळतही नाही, हे ही एक अप्रुपच ! ” केंव्हा तरी पहाटे उलटून ग्लास गेला मिटले चुकून डोळे धडपडून जीव गेला” असं काहीस झालं होतं, ते नंतर दुसऱ्या पहाटेसच कळलं होतं. होतं असं कधीतरी ………………. नभ मेघांनी आक्रामिले तारांगण सर्वही व्यापुन गेले अहोअसे नुसतेच आक्रमिले नव्हे तर ……………. अकरा किलोमीटर उंचीचे ढग अबबब …….. बापरे …………. ढगफुटी होऊन जेंव्हा बदाबदा कोसळले तेव्हा …….. खड्यात असणाऱ्या की रस्त्यात खड्डे असणार्या रस्त्यांवरची वाहने लहानपणी कागदाच्या होड्या पाण्यात सोडायचो तशा चक्क वाहून गेल्या. ए दिल है मुश्कील जीना
यहा जरा हटके जरा बचके ये है पूना मेरी जां ! असं मनांत आलंच.
शेवटी काय आहे, पावसाळा हिवाळा उन्हाळा या तीन ऋतूत त्यांचे त्यांचे जीवन तराणे ते घेऊन येतात अन जातात, आपण मात्र त्यांच्या चालीने, गतीने, त्यांच्या कलेने, त्यांच्या मूडने ” पाहिले न मी तुला पाहिले न तु मला ” अशा गुलाबी संभ्रमात असतो हे ही तितकेच खरे …………. हो ना ? कदाचित तो मी नव्हेच किंवा केला तुका झाला माका, खरं तर घुसूच नये पण कट्यार काळजात घुसुली असं काहीसं या बदलत्या ऋतुमानाप्रमाणे घडलं तर ती प्रेमाची कट्यार सुद्धा काळजात घुसवून घ्यायला इच्छेने नाविध्चिने तयार रहायला हवेच हो! कारण सर्वकाही बदलत आहे उघडा डोळे बघा नीट, दुनिया मुठ्ठीमें,एक पाऊल पुढे …………..ऋतु हवामान, तापमान, निसर्ग, जीवनशैली, नात्यागोत्यातला आप्तभाव, प्रेम माया ममता लळा जिव्हाळा, आपुलकी ………….. अन मैत्रीमधल्या रेशिम धाग्याचा मुलायमपणा, त्यातली नजाकत, त्यातला ओलावा, मऊपणा, त्यातल्या सप्तरंगी इंद्रधनुप्रमाणे असणारा रंगांचा आपलेपणा हवाहवासा मोहकपणा, पुळणीवरच्या वाळूवरचा मुधोळपणा, लाटांवर स्वार होणारा चैतन्याचा झरा, झर्यातून खळखळ वाहणारा शब्दांचा झंकार, त्या झंकारातून प्रतिध्वनीत होणारा” आ लौटके आजा मेर मीत तुझे मेरे गीत बुलाते है मेरा सूना पडा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते है !………………. ! ! !
याचि देहा याचि डोळा पाहिलेल्या स्वप्नांतल्या कळ्यांना आता तरी सजगता यावी अन फुलले रे क्षण माझे फुलले रे………….. असे सभोवताली फुलून यावे असं खरंच मनापासून वाटते हो ! ! ! ! !
®️ सुनील शरद चिटणीस
२८ ऑक्टोबर २०२२