दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-नांदेड येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील व्यापाऱ्याचा संत्रा माल नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.संत्रा माल जागेवरच खराब झाल्यामुळे जवळपास १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने संत्रा व्यापाराला ४ तारखेला संत्रा मार्केट उघडणार आहे आणि ५ तारखेला पथ्रोट वरून संत्रा माल रवाना करावा असे पथ्रोट येथील व्यापाऱ्यांना सांगितले होते.परंतु अचानक संत्रा व्यापाऱ्यांना सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मॅसेज आला की संत्रा माल आणू नका त्यामुळे येथील व्यापारी समवेत शेतकरी सुद्धा आर्थिक संकटात सापडला आहे.पथ्रोट येथील व्यापारी व शेतकरी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे प्रहारचे बाळासाहेब रोंघे यांनी सांगितले आहे.जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर प्रहार आक्रमक पवित्रा घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.