दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
भारताचे युवा नेते मा.खा.राहुलजी गांधी हे नुकतेच भारत जोडो यात्रे दरम्यान महाराष्ट्रात आगमन नांदेड जिल्यातील देगलूर येथून केले असुन दि.08/11/2022 रोजी सकाळी वन्नाळी येथील गुरूद्वारा येथून शंकरनगर – नांदेड या मार्गाने मार्गस्थ होत असताना वझरगा येथील श्री. व्यंकटराव पाटील जालने काँग्रेसचे नांदेड जि.म.सहकारी बॅकेचे विद्यमान संचालक यांचे पुतणे व श्री. भगवानराव जालने मा. सभापती पं.स.देगलूर यांचे छोटे बंधु श्री. किरणकुमार बालाजीराव जालने पाटील युवा उद्योजक ” पुण्यश्लोक कृषी सेवा केंद्र, वझरगा. ” यांचे मालक यांची भारत जोडो यात्रे दरम्यान भारताचे युवा नेते, भावी पंतप्रधान मा.खा.राहुलजी गांधी यांनी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या व्यवसायाची व तरूण युवकांच्या प्रश्नांविषयी, समस्याविषयी आपुलकीने विचारपुस केली व मनसोक्त गप्पा मारल्या.
भारतातील एवढ्या मोठ्या युवा नेत्यांनी सामान्य माणसांशी नाळ जोडून सर्वसामान्यापर्यंत पोहचुन आस्थापुरक चौकशी करणारे एकमेव नेते आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वान नेतृत्वाने युवा मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण केली आहे. या तरुण उद्योजकाच्या भेटी बद्दल नांदेड जि.म.सहकारी बॅकेचे संचालक श्री. व्यंकटराव पाटील जालने, मा.सभापती पं.स. देगलूर श्री. भगवान पाटील जालने, ग्रामपंचायत कार्यालय वझरगा चे सरपंच प्रतिनिधी श्री. रूख्माजी औरादे, उपसरपंच श्री. बाबाराव सुर्यवंशी व सर्व सदस्य तसेच प्रा.गोविंद पाटील, दत्ता जालने सर, नागनाथ राजुरे सर, मारोती पाटील, मधुकर जालने, ज्ञानेश्वर कोकणे, माणिक सुर्यवंशी, व्यंकटेश पाटील, नचीकेत सुर्यवंशी, हरीदास कोकणे सर, लक्ष्मण सुर्यवंशी, प्रतिक राजुरे, बबन गदले, अमोल वाघमारे, आदींनी या अविस्मरणीय भेटीबद्दल युवा उद्योजक श्री. किरणकुमार जालने पाटील यांचे कौतुक केले व वझरगा येथील सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या अविस्मरणीय भेटीबद्दल
गावात व जालने परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण जालने परिवार हा पुर्वी पासुन काॅग्रेस पक्षांशी एकनिष्ठ आहे..