दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..गावाखेड्यासह शहरी भागातही रात्री झोपण्यासाठी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत नारळाच्या दोरीने विनलेल्या खाटेचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. काही दिवसांनी त्यात बदल होऊन रेशमची दोरी, सुताची दोरी वापरल्या जाऊ लागतील. त्याचप्रमाणे सुताच्या पट्ट्याची खाट विणल्या जाऊ लागली. पण जसजसे लाकडी दिवाण बाजारात येऊ लागले, तसतसे खाट व निर्मितीचे काम हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे एकप्रकारे दिवाणच्या वापारामुळे खाट विणण्याचा व्यवसाय कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
अगोदरच्या काळात दिवसभर काबाड कष्ट करून रात्रीची आरामदायी झोप घेण्याकरिता नारळाच्या दोरीचा आधार घेतला जात होता. त्यामध्ये मोठ्या व्यक्तीकरिता मोठी खाट तर लहान मुलांकरिता ग्रामीण भागात रूढ असलेली ‘खटोली’ विणल्या जात होती. त्यामुळे पूर्वी प्रत्येक किराणा दुकानांमध्ये नारळाच्या दोरीचे मोठमोठे बंडल विक्रीस येत असत. एक खाट विणण्याकरिता तीन किलो दोरीचा वापर केल्या जात होता. त्यात उस्त आणि पायतं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या राहत होत्या. दोन, चार, सहा अशा सम संख्येचे पदर घेतल्यास झोपणाऱ्या व्यक्तीला खराब स्वप्न पडतील. याची खाट विणणारा व्यक्ती काळजी घेत होता. त्यामुळे तीन, सहा, नऊ अशा विषम संख्येचे पदर घेण्यावर विणकार व्यक्ती लक्ष देत असे, फुटकी खाट विणून झोपणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होऊ नये म्हणून मोबदला देऊन विणली जात होती.
ग्रामीण भागात ज्या कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, त्या घरात प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र खाट कसायची. खाटीच्या मध्य भागात झोल पडताच घरातील बुजूर्ग व्यक्ती खाटीचं पायतं ताणून तिला सुस्थितीत ठेवीत असत. हळूहळू नारळाच्या दोरीचे महत्त्व कमी होऊ लागेल. बदलत्या जीवनमान पद्धतीचा परिणाम प्रत्येक ठिकाणी जाणवू लागला. त्यामुळे नवनवीन दिवाणमुळे खाटविक्रीचा व्यवसाय आता जवळपास बंद होत आला आहे.