दैनिक चालू वार्ता उपसंपादक लातूर- प्रा.मारोती बुद्रुक पाटील
(थेट आळंदी येथून)
संतांनी भागवत संप्रदायाची पताका साता समुद्राच्या पलीकडे घेऊन जाऊन इथल्या जाती धर्मातील पंथातील प्रत्येकाला एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली आहे.संताच्या निस्वार्थ कार्यातून खरे माणुसकीचे दर्शन होते असे प्रतिपादन दिंडीचे प्रमुख लहू महाराज भारती यांनी केले.
पुढे बोलताना लहू महाराज भारती म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची पावन पवित्र भूमी आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायाने या भागवत सांप्रदायाचा मोठा इतिहास निर्माण केला आहे.नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा ज्ञानाचा दीप अखंडपणे तेवत ठेवण्याचे काम संताच्या माध्यमातून झाले आहे.असे ही भारती म्हणाले.
श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकोबाराय पालखी सोहळ्यात ज्ञानोबा तुकाराम दशनाम गोस्वामी दिंडीत इंजिनीयर नवनाथ इंगळे यांनी पहिली पंगत देऊन संकल्प पूर्ण केला.
गेल्या पंधरा वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी निरंतर चालते. जवळपास तीनशे वारकऱ्यांची पाई वारी तीर्थक्षेत्र आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळा चालतोय टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या उच्चारात भक्तगण तल्लीन होत असतात.या दिंडी सोहळ्यात पुणे येथील इंजिनियर असलेले व लातूर अहमदपूर चिलखा येथील रहिवासी असलेले नवनाथ यशवंतराव इंगळे यांनी ज्ञानोबा तुकाराम दशनाम गोस्वामी दिंडीच्या वारकऱ्यांना पहिली पंगत व महाप्रसादाचा संकल्प पूर्ण केला.
या वेळी दिंडीचे प्रमुख लहू महाराज भारती,आनंद महाराज जोशी, दैनिक चालू वार्ताचे लातूर उपसंपादक प्रा मारोती बुद्रुक पाटील, चेअरमन यशवंतराव इंगळे,प्रदीप शेलार प्रमोद शेलार, इंजिनीयर नवनाथ इंगळे,रोहिदास इंगळे, पोलीस पाटील बाबासाहेब तातेबा,शिवाजीराव ऊडण,अंकुशराव घुले, चेअरमन प्रशांत आगे, पोलीस ज्ञानेश्वर गिरी, आदींची उपस्थिती होती.