दैनिक चालू वार्ता बल्लारपूर प्रतिनिधी -कमलेश नेवारे
बल्लारपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेका निमित्त बल्लारपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत 240 मुलांमुलींनी आपला सहभाग नोंदविला असून स्पर्धेत
प्रथम क्रमांक – सई दीपक गायकवाड
द्वितीय क्रमांक – सुकांशी सुनील यादव
तृतीय क्रमांक – मोहिनी राजू वानखेडे
यांनी पटकावला असून विजेत्या स्पर्धकांना मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया व चंद्रपूर जिल्हा* यांच्या हस्ते पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन हें बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांनी केला असून यात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, सचिव शशिकांत मुंडे जी, नारायण सुक्का जी, कमल वर्मा की, विनोद कोवे जी, गणेश चंदेल जी, मुरली व्यवहारे जी, रुपेश भैया आदी उवस्थित होते.