दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :बऱ्याच वर्षापासून शिवसेना पक्षाची मागणी असलेल्या औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरण प्रस्तावाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिली.औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव नामकरण प्रस्तावाला २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सरकारने मंजुरी देण्यात आली होती आणि त्याबाबतचा शासन आदेशही जारी करण्यात आला होता.तसेच रा.प. महामंडळ मुंबई यांचे २८ फेब्रुवारी २०२३ राप/जसं/१११ या जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील संपूर्ण बस स्थानक प्लॅटफॉर्म सूचीतील नाव बदलण्याचा निर्णय रा.प.महामंडळाने घेतला होता.परंतु अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी बस स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील औरंगाबाद शहराचे नाव अद्यापही बदलविण्यात आले नव्हते.त्यामुळे प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी १० जून रोजी आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून चूक लक्षात आणून दिली व त्यासंदर्भात ११ जून रोजी सदर बातमी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आणि तात्काळ दर्यापूर आगार अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव सुर्जी बस स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आले.