दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली कुंडलवाडी तालुक्यात गेली तिन चार दिवस झाली पावसामुळे ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडुन गेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यांत यावी अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या कडे केली आहे…
देगलूर नांदेड रस्ता बंद झाला असून नायगाव बिलोली कुंडलवाडी धर्माबाद परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे 20 जुलै रोजी सुरू झालेल्या धो धो पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुराने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.शाळकरी विद्यार्थ्यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली.नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या वन्नाळी लख्खा कुंचेली फाट्याजवळ नाल्यांना आलेल्या पावसाच्या पुरामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने नागरिकांना तीन तास पावसात अडखळत बसावे लागले तसेच देगलूर नांदेड रस्तावर असलेल्या नाल्याला नदीचे स्वरूप आल्यानै लख्खा गावी जाणारे 25 विद्यार्थ्यी व ग्रामस्थ अडकले या सर्वांची व्यवस्था येथिल गुरुद्वारात करण्यात आली आहे दरम्यान नाल्यातील पाणी आल्याने देगलूर नांदेड रस्तावर वन्नाळी ते वझरगा हा रस्ता बंद करण्यात आला आहे वन्नाळी येथिल एक शेतकरी बेपत्ता आहे तर एक शेतकरी शेतातच अडकून पडला आहे तसेच मन्याड नदी ही दुधडी भरुन वाहत असुन जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे बिलोली तालुक्यातील गंजगाव ते कार्ला मार्गावर पुलाचे काम सुरू आहे या कामावर असलेले दोन बिहारी मजुर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून पडले आहेत सध्या ते नजिकच्या झाडावर असुन त्यांना भोई समाज चे तरुण त्यांना वाचवण्यासाठी गेले आहेत
ढगफुटी सारख्या पाउस पडल्याने परिसरातील अनेक शेतामधील पिकांसह मातीदेखील खरडुन गेली व शेताचे रुपांतर हे तळ्यात झाले.अनेक शेतामध्ये पाणी थांबवुन राहिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यावर्षी खरीप हंगामात आधीच पेरणी उशीर झालेला असताना थोड्या फार पाऊस झाल्यामुळे पेरणी केल्यानंतर जुलैमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांनमध्ये चिंतेची बाब निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहाणी करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी या करीता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करतेवेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी..केली.