दैनिक चालु वार्ता…
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी”आयुष्यमान भव” कार्यक्रम बुधवारी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत व वैद्यकीय अधीक्षक डॉ, गजानन टारपे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनी मार्गदर्शन केले. ३१ डिसेंबरपर्यंत या अंतर्गत आयुष्यामान आपल्या दारी, आयुष्यामान सभा, आयुष्यामान मेळावे, अंगणवाडी व प्राथमिक शाळेची तपासणी देशभर करण्यात येऊन आयुष्यामान कार्ड व आभा आरोग्य कार्डही नोंदणी करून वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ वैजापूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उपस्थित रुग्ण, नातेवाईक व नागरिकांना धोंडीराम राजपूत यांनी केले. हे कार्ड धारकास पांच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. या साठी सर्वांनी हे कार्ड प्राप्त करून घ्यावे असे राजपूत म्हणाले. आतापर्यंत देशातील २५ कोटी नागरिकांनी हे कार्ड प्राप्त केलेले आहे. उर्वरित देशवासियांना ही हे कार्ड मिळावे यासाठी आयुष्यामान भव हा कार्यक्रम आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत देशभर राबविण्यात येणार आहे. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश आंधळकर, डॉ. दीपमाला मरमट, डॉ. जी. गायकवाड, मुख्यपरिचारिका सातदिवे, रुखमींनी गवई, सातदिवे,पडवी, अंजली गायकवाड, शीतल वाघ रोहिनी उफाडे, एम एम., मापारी, राज पवार, हनिफ शेख, विजय पाटील, शशिकांत पाटील, राजू लाठे, श्याम उचित, पंकज कांबळे, विणकरे उपस्थित होते.