नवी दिल्ली : शिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विजयी संघ भारताशी भिडणार आहे. दुसरीकडे, पावसाने व्यत्यय आणला तर मात्र श्रीलंकेला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल हे निश्चित आहे.17 सप्टेंबरला कोलंबोमध्ये अंतिम सामना होणार आहे.
आशिया कप 2023 स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. पण या मालिकेसाठी अजून टीम इंडियाची घोषणा झालेली नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर संघाची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. तसं पाहिलं तर आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपसाठी तोच संघ आहे. त्यामुळे त्यात काही बदल होईल असं वाटत नाही.ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही संजू सॅमसनला स्थान मिळणार नाही, हे निश्चित आहे. आशिया कप स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून त्याचं नाव होतं.
पण आता तो माघारी परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळणार नाही, असंच म्हणावं लागेल.श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत चिंता आहे. त्यामुळे आता आशिया चषकाच्या उर्वरित सामने आणि वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. अय्यरची दुखापत गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.