दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
मुंबई :- देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. कामगार नेते अॅड गुणवंत सदावर्ते यांच्यासह ११० जणांना संशयीत म्हणून अटक केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार खडबडून जागं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे.
या बैठकीत शरद पवार आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या पवारांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे, त्यामुळे त्यांच्या आणि पवार कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.