दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
कडा – साखर कारखान्यातील प्रष्टाचार आणि अकार्यक्षमता संपविण्यासाठी दोन साखर कारखान्यातील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करावी यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने दिंद्रुड सा. माजलगाव जि. बीड येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत ऊस परिषद आयोजित केली आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.
सन २०१३ साली झालेल्या ऊस आंदोलनात चंद्रकांत नलवडे आणि कुंडलिक कोकाटे यांच्या बलिदानानंतर पृथ्वीराज चव्हाण सरकारने ऊसदरासाठी (आरएसएफ) चा कायदा केला. परंतु भाजपाचे केवळ १२२ आमदार असताना साखर कारखानदारांच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने ऊसदरासाठीच्या (आरएसएफ) कायद्याची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन कापड गिरण्या, दोन सोयाबीन तेलाचे कारखाने, दोन पेट्रोल किंवा डिझेल कारखाने, दोन मोटारसायकलीचे कारखाने, दोन लोखंडी सळीचे कारखाने, दोन ट्रकचे कारखाने यासाठी कुठेही अंतराची अट नाही. मग साखर कारखान्यांसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट का? यावर ऊस परिषदेत चर्चा होणार आहे. ऊस परिषदेला अँड. अजित काळे, रामेश्वर गाडे, शिवाजीराव नांदखिले श्रीमती विमलताई आकनगिरे, आनंद भालेकर, बंडू सोळंके, बाळासाहेब पठारे, धनंजय काकडे, दिनकर दाभाडे आदि मार्गदर्शन करणार आहेत. ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सुभाष गायकर, केशब फाळ, पांडुरंग ठोंबरे आणि बीड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनुरथ काशीद, अजिमोदिन शेख यांनी केले आहे.
गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेशात १०% | रिकव्हरीसाठी प्रतिटन ३५००/ रुपये (एसएपी) सरकारी निर्धारित किंमत असतानाही महाराष्ट्रातील साखर सम्राटांनी रिकव्हरी चोरी, काटामारी करून शेतकन्यांना (एफआरपी) बाजवी आणि किफायतशीर किंमती भोवताली गुंतवून ठेवले आहे. दोन सिमेंट कारखाने,