दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
राज्याचे गृहमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर असतानाच औंध पोलिस ठाण्यांच्या लॉकअप मधून पळून गेलेल्या ५ दरोडेखोर याप्रकरणी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोधे यांच्यासह पोलिस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले. यांत सपोनि प्रशांत बोते पोलीस हवालदार संतोष कोळी, कुंडलिक कटरे, शिवानंद नारायणी, अंकुश गलांडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9 मे रोजी पहाटेच्या सुमारांस पोलिस ठाण्यांच्या लॉकअप तोडून पाच अट्टल दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यांतून पलायन केले. या घटनेमुळे परिसरांसह संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता. यांत दिनांक 8 व 9 मे रोजी राज्यांचे गृहमंत्री ना दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातबर मंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर होते अशा वेळी पोलिसांनी सतर्क असणे गरजेचे असताना सुद्धा औंध पोलीस यांचा मात्र गलथान कारभार सुरु होता. याचाच गैरफायदा घेत दरोडेखोरांनी लॉकअपचे दार तोडून पलायन केले. या वृत्तानंतर लगेच दिनांक 11 मे रोजी एसपी अजयकुमार बन्संल यांनी पाच जणांना निलंबित केले तसेच तातडीने औंध पोलीस ठाण्यांच्या कारभारांनाच निलंबित केल्यामुळे त्यांच्या जागेवर आता सपोनि दत्तात्रेय दराडे यांची नियुक्ती करीत असल्यांचा आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 11 मे रोजी काढला दरम्यान एसपींच्या या कारवाईनंतर आता तरी जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करुन गुन्हेगारीला पायबंद घालतील अशी अपेक्षा आहे.