दैनिक चालू वार्ता
पालघर मोखाडा
प्रतिनिधी:-अनंता टोपले
जगातील पहिला महाकाव्य ग्रंथ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माननीय उपजिल्हाधिकारी माननीय वैदेही रानडे मॅडम यांच्या हस्ते पार पडले ह्या महाकाव्य ग्रंथात २०२१ साल म्हणून २०२१कवींच्या प्रत्येकी एक कविता असून या महाकाव्य ग्रंथात फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरच कविता असून २० ऑक्टोबर २०२१ रोजी ३६ जिल्ह्यात, ३६ जिल्हाधिकारी कुलगुरू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेला महा काव्य ग्रंथ आहे याचे श्रेय हे मा. प्रा.अशोक कुमार दवणे सरांकडे जात आहे.
३ किलो वजनाचा २०२१ कवींच्या कवितांचा महाकाव्य ग्रंथ हा जगातील पहिला महाकाव्य ग्रंथ हा जगातील पहिला महाकाव्य ग्रंथ असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी तशी तयारी प्रकाशकांनी खूप मेहनत घेऊन केली आहे.पालघर जिल्ह्याचा विचार करता २०२१ कवींच्या कविता आहेत त्यातील २१ कवी पालघर जिल्हातील आहेत हे विशेष आहे.
ठाणे जिल्हाधिकारी सभागृहात पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यात उप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ कवी प्रा.माधव गवई, प्रा.विठ्ठल शिंदे,मा.रामचंद्र जंगले,मा.नवनाथ रणखांबे,मा.अमर नवघरे, मा.सोनजी वावळकर,मा.मोहन बारकु गुहे यांच्या उपस्थित पार पडलेल्या सोहळ्याचे साक्षी दार होण्याचा मान मिळायला आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महा मानव महाकाव्य ग्रंथात प्रत्येकाची एक कविता असली तरी ती कविता मान,सन्मान देऊन जाते आणि या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या २०२१ कविता मधे आपल्या एक कवितेचा समावेश होणे म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे,कविता संग्रह नाही झाला तरी चालेल पण माझ्या एका कवितेचा समावेश या महाकाव्य ग्रंथात झाला हीच मोठी बाब आहे,असे मत आदिम मोहन गुहे यांनी व्यक्त केले आहे.