दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनीधी- दत्तात्रय वामनराव कराळे
पूणे : डी.एस.लोखंडे नामक तरुणाच्या मुख्य संपादनाखाली अल्पावधीत उंच भरारी घेतलेल्या “चालू वार्ता” या मराठी दैनिकाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नुकताच तोंड भरुन कौतुक केले आहे.
माध्यमांसाठी चालू असलेला कसोटीचा काळ त्यातच आकाशाला भिडलेली महागाई, बाजारातील कमालीची आर्थिक डबघाई, वाढत्या धावपळीत बुध्दीला आवश्यक असणारी चालना त्यातच व्यवसायासाठी लागणारं मोठं मानसिक बळ
या व अशा नानाविध समस्यांचं हे भलं मोठं आव्हान असूनही ते पेललं जाईल का नाही, हे सारं माहीत असूनही चक्क आठ पानी रंगीन, तेही मोठ्या आकाराचे वृत्तपत्र चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय.
होय, ती कसरतच आहे, तरीही लोखंडेंच्या ज्ञानेश्वर रुपी या तरुणाने हाती घेतलेला हा वृत्तपत्रीय वसा अगदी उतणार नाही, मातणार नाही, जणू याच जिद्दीने मागील एक वर्षापासून चालविल्याचे दिसून येत आहे.
वृत्तपत्र व्यवसायात एके काळी शेटजी-भटजींनी घेतलेली उत्तुंग भरारी आणि त्यांना त्या काळी मिळणारी टाटा-बिर्लांसारख्या गर्भ श्रीमंतांची आर्थिक झळाळी हे तर सर्वश्रूत आहे. तरीही आपण मागे का राहायचे, या जिद्दीने बोटावर मोजण्याइतपत कांहीं मराठी माणसांनी कासवाच्या गतीने का होईना परंतु टाकलेले पाऊल माय मराठीला चालना देण्याबरोबरच वृत्तपत्रासाठी गगन भरारी नसली तरी शांत डोक्याने जमिनीवर चालणारी ती संशोधनात्मक वैचारिक वारी च म्हणावी लागेल.
मराठवाड्यातील सामान्य घरातील एका तरुणाने एवढ्या मोठ्या वृत्तपत्रासाठी केलेलं हे धाडस म्हणजे आदर्शवत तथा कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल. जिल्हा व तालुका स्तरावर नियुक्त ६० ते ७० प्रतिनिधींचं जाळं, कार्यालयीन व्यस्थेबरोबरच सातत्याने प्रतिनिधींशी साधला जाणारा संवाद, प्रत्येकाकडून आलेल्या बातम्यांची छानणी व अग्रक्रमाने लावली जाणारी मांडणी हे कामही काही साधी बाब निश्चितच नाही. वृत्तपत्रांच्या दिमतीला इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही अग्रीम स्थानी ठेवत मुख्य संपादकांची धुरा सांभाळणारे डी.एस.लोखडे यांची सातत्याने चालणारी धडपड लवकरच गगनभरी घेतल्याशिवाय राहणार नाही, हे आजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्यावर अभिमानाने सांगावेसे वाटते.
श्री. लोखंडे यांनी मागील काही दिवसांपासून राजकीय नेते, आमदार, खासदार, नामदार व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याही भेटी-गाठी घेणे, राजकीय संवाद साधणे, त्यांच्या आशीर्वादाची थाप मिळवणे हा क्रम सातत्याने सुरु ठेवला जात आहे.
वाढत्या महागाईच्या वणव्यात ही आपल्या वृत्तपत्राचे सातत्य बाजारात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तर करावीच लागते परंतु त्यासाठी खरी गरज असते ती अर्थकारणाची. खिशात पैशाचा बटवा भरलेला असेल तरच बाजारात आपली किंमत केली जाते अन्यथा बाष्कळ वल्गना काय कामाच्या हे ध्यानी घेऊन निकट असलेले मान्यवरही पाठ फिरवताना अनेकदा अनुभवास येत असते. माध्यमांच्या बाजारात आपला दर्जा टिकवून ठेवायचा असेल तर चिकाटी व जिद्द आणि आत्मविश्वास या तिन्ही ची सांगड निकडीची असते. आर्थिक कणा मजबूत करायचा असेल तर जाहिराती मिळणे अथवा त्या मिळवणे हे सुध्दा अत्यंत अगत्याचे असते. परिणामी आपल्याला अनेकांचे उंबरठे झिजवणे भाग पडले तरी चालेल. कोणतेही वृत्तपत्रं चालवताना राजकारणी मंडळींबरोबर औद्योगिक क्षेत्रात नामवंत अशा विविध मान्यवरांचे ही आशीर्वाद अगदी “मस्ट” आहेत. तर आणि तरच माध्यमांचा दर्जा सुधारण्याबरोबरच प्रगतीचा ही आलेख उंचावला जाऊ शकेल.
मागील एक वर्षाच्या कालखंडात वृत्तपत्रांचा हा गाडा हाकताना किती पापड ठेवावे लागले असतील, हे “चालू वार्ता” या दैनिकाच्या परिवारच जाणून शकेल.
माजी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री मंत्री या. अजित पवार यांनी भरभरुन अनेकोत्तम आशीर्वाद दिले परंतु त्यांच्याकडे असलेला राज्याचा आर्थिक खजिना आमच्यासाठी ही फायद्याचा ठरला जाईल असे वाटले होते परंतु तो खजानाही त्यांच्याकडून दुर्दैवाने अगदी पुणे निघून गेला आहे. अर्थात ह्या सगळ्या राजकीय घडामोडी कधीही स्थीर नसतात. अगदी त्यांनाही माहिती नसते की, आपण किती दिवस सत्तेत व मंत्रीपदी राहू शकणार ते ?
पण एक खरे आहे की, कोणत्याही उपक्रमाचा दर्जा सुधारायला असेल, त्यातील सातत्य टिकवून ठेवायचे असेल आणि इत्तरांना टक्कर नाही परंतु बरोबरीने का होईना, त्यासाठी आपल्या अंगी मेहनती बरोबरच कोणाच्या न् कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज ही असावीच लागते.
आत्तापर्यंत सन्माननीय वाचक वृंद जनता-जनारदनाची, जाहिरात दारांची आणि कळत न कळत ज्यांनी ज्यांनी साथ दिली, त्या सर्वांचे लाख मोलाचे ऋण मान्य करुन चालू वार्ता दैनिकाच्या संपूर्ण परिवार पुढील वर्षाच्या सेवेसाठी नव्या जोमाने, अधिक ताकदीने आणि तेही तुमच्या साक्षीने सेवा देण्याचे वचन देत आहे !
आम्हाला खात्री आहे की, आगामी काळात विद्यमान विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर आम्हाला नक्कीच भरभरुन आशीर्वाद देतील, यात तिळमात्र शंका नाही.