दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
परभणी : “आज विविध शाळां मधून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी उद्या किती तरी नामांकित असे डॉक्टर होणार आहेत, आर्किटेक्चर, इंजिनिअर होणार आहेत, शास्त्रज्ञ होणार आहेत, कित्येकजण वैमानिकही बनले जातील परंतु त्यासाठी त्यांना, त्यांच्या पालकांना या यशप्राप्ती साठी काय काय यातना सहन कराव्या लागतील, कष्ट घ्यावे लागतील याचेही अगाध असे ज्ञान, जे त्यांना बाळकडू म्हणून समजू शकेल अशा अत्यंत शेलक्या भाषेत दिले यात तिळमात्र शंका नाही. थोडक्यात काय तर आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्यच ठरले जाणार आहेत, यात तिळमात्र शंका नसावी” असे हितगुज, मौलिक संवाद विद्यार्थ्यांशी साधलाय सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी. हसणे, हसविणे आणि बोलता बोलता साधे विचार, सोप्या भाषेत अगदी सहजतेने मांडले जावेत अशा बाल्यावस्थेत मांडण्याची एक जबाबदार भूमिका शिवानंद टाकसाळे यांनी विद्यार्थ्यांशी निभावली आहे. परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असूनही पदावर आपण कोणी तरी मोठे किंवा विशेष असल्याचे न दाखवता, त्याचा भास होऊ न देता जणू काही विद्यार्थ्यांपैकीच एक असल्याचे दाखवत त्यांनी जो अन्य विद्यार्थ्यांशी संवाद साधला तो उल्लेखनीय असाच म्हणावा लागेल.
पाथरी येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात श्री. टाकसाळे यांनी हा संवाद “अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वच्छता हीच सेवा” या औचित्यावर साधून एक आगळा वेगळा पायंडा पाडला. लहान वृक्षांची लागवड करुन त्याला योग्य त्या पध्दतीने जोपासले, त्याचे चांगले संवर्धन केले तर त्याची वाढ उत्कृष्ट होते नि भविष्यात फळेही गोडच मिळतात. कदाचित हीच भावना उराशी बाळगून श्री. टाकसाळे यांनी त्या गोंडस मुलांशी साधलेला संवाद एक मौलिक हितगुज ठरु शकेल यात शंकाच नसावी.
जन्मदात्या आई-वडिलांचा विसर तसूभरही न पडू देता, त्यांचे उपकार हाच अमोल ठेवा समजून त्या जाणीवेत कायमचे सातत्य राहिले पाहिजे असे सांगितले. एवढेच नाही तर मां जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांचे चरित्र वाचून त्या अगाध शिकवणी मौलिक ठेवा म्हणून आत्मसात करणे याचेही आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी श्री. टाकसाळे यांनी पाथरी पंचायत समितीने राबविलेले उपक्रम आणि वस्तीगृहातील सुविधा व समस्यांचे अवलोकन केले. जेणेकरून तेथील सोई-सुविधा विद्यार्थ्यांसाठी पुरक प्रेरक करण्यासारख्या उपलब्ध आहेत का नाही, याचीही खातरजमा केली. यावेळी त्यांचे सोबत गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.