दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद :आज कल्याण ,मुंबई येथे भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष ,पालघर लोकसभा प्रभारी,नवसारी विधानसभा, गुजरात प्रभारी मा आ श्री नरेंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते भाजप च्या कल्याण जिल्हा कार्यालयात लातूर जिल्ह्यातील युवक नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व ,श्री धनराज विक्रम गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे .निवडप्रसंगी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष श्री शशिकांतजी कांबळे ,उपाध्यक्ष श्री नाना सूर्यवंशी ,कल्याण शहर अध्यक्ष भाजपा श्री प्रेमनाथ म्हात्रे, डोंबिवली भाजप शहर अध्यक्ष श्री नितेशजी पेनकर, कार्यालय मंत्री श्री राज खैरनार,युवक नेते श्री राहुलजी भोईर इत्यादी सर्वजण उपस्थित होते.
सदरील निवडीबद्दल उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोदजी तावडे,राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील ,केंद्रीय मंत्री श्री भागवत कराड,केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील ,भाजप प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे ,महसूलमंत्री राधजकृष्णजी विखे पाटील, मंत्री गिरीशजी महाजन, सहकार मंत्री अतुलजी सावे,मंत्री रवींद्रजी चव्हाण,मंगलप्रभात लोढा,सुरेशजी खाडे ,माजी मंत्री श्री संजयजी कुटे ,खासदार पूनम ताई महाजन,खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,खासदार सुधाकरजी शृंगारे,माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यूजी पवार,लातूर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेशजी कराड,आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार रत्नाकरजी गुट्टे,माजी मंत्री भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री विनायकराव पाटील ,भाजप नेते श्री आ सुधाकरजी भालेराव, मा आ गजाननराव घुगे,मा आ गोविंदराव केंद्रे ,मा आ केशवराव आंधळे, मा भाजप नेते श्री राहुलजी केंद्रे आदी सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
32 वर्षीय धनराज गुट्टे हे उच्च शिक्षित असून उत्कृष्ट संघटक व उत्कृष्ट वक्ते आहेत.गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी प्रदेश भाजप च्या अनेक जबाबदारी सांभाळेलेल्या आहेत.इतर राज्यात जाऊन सुद्धा त्यांनी पक्षाने दिलेले काम केले आहे.वंजारी समाजाची सर्वात बलाढ्य एकमेव संघटना असणाऱ्या अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत.देशभरात त्यांचं कार्यकर्त्याच खूप मोठं नेटवर्क आहे.प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. देशभरात प्रवास करत असताना त्यांचे मूळ गाव येलदरवाडी ता अहमदपूर जिल्हा लातूर येथील ग्रामपंचायत एकहाती त्यांच्या ताब्यात आहे.त्या जन्मगावाला ते विकासाचा मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पक्षाने त्यांना आता संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णवेळ भटक्या विमुक्तांच संघटन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यात मराठवाडा हे त्यांचे विशेष प्रभार असणारे कार्यक्षेत्र असणार आहे .
एका सर्वसामान्य कुटुंबातील चळवळीतील सामान्य युवकाला पक्षाने पुन्हा एकदा प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
–